शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पालिकेकडून मनी व मुनीच्या चौकशीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर; सेनेच्या तक्रारीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 3:12 PM

आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

राजू काळेभार्इंदर, दि. २४ - आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी राज्य निवडणूक आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला पाठविलेल्या पत्रात त्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेने नुकताच चौकशी अहवाल आयोगाला सादर केल्याचे पालिका उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.निवडणुकीपूर्वी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळत नसल्याने त्याची दोरी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली. निवडणुकीत प्रचार सभांद्वारे भाजपालाच मतांचा जोगवा देण्याच्या आनाभाका घालण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपाच्याच हाती सत्ता यावी, यासाठी केंद्र तसेच राज्यातील भाजपा मंत्र्यांसह खासदार, आमदारांना मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान विविध खासगी संस्थांच्या मार्फत केलेल्या सर्वेक्षणात भाजपा ३५ ते ४० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली.काहींनी पहिल्या क्रमांकावर शिवसेना तर काहींनी शिवसेना, भाजपा व काँग्रेसची त्रिशंकू सत्ता येणार असल्याचे भाकीत केले. या सर्वेक्षणामुळे बिथरलेल्या काही भाजपा उमेदवारांनी आपापल्या प्रभागांतील मतदारांना पैसे वाटल्याचे समोर येऊ लागले. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शहराला ख-या अर्थाने निवडणूक दंगलीचे स्वरुप येऊ लागले. याप्रकरणी पोलिसांत शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांनी त्या पैसे वाटपाविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात तथ्य आढळले नसल्याची क्लिन चीट पोलिसांकडुन देण्यात आल्याने विरोधकांची हवा गुल झाली. तरीदेखील ही निवडणूक हाती राखण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी चालविलेल्या भाजपाने अखेर धर्माचे शस्त्र बाहेर काढले. शहरात गुजराती, मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने धर्मगुरुंच्या माध्यमातुन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यांना भाजपाच्याच पारड्यात मते टाकण्याच्या आवाहनाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. आणि अखेर भाजपाने सत्तेसाठीचे बहुमत मिळविलेच. एकूण ९५ पैकी ६१ जागांवर विजय संपादन करून भाजपाचे एकहाती सत्तेचे स्वप्न सत्यात उतरले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिळविलेल्या अहवालात भाजपा ६० ते ६५ जागा मिळविणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने मतदानाच्या आदल्या दिवशीच भाजपा सत्ता काबीज करणार असल्याचे संकेत मिळाले होते. परंतु भाजपाने बहुमत मिळविण्यासाठी मनी आणि मुनीचाच वापर करुन सत्ता मिळविण्यासाठी धर्माचाच आधार घेतल्याचा आरोप करीत त्याच्या चौकशीची मागणी देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

टॅग्स :Anil Desaiअनिल देसाई