शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

पुनर्विकासासह पुनर्वसन ऐरणीवर

By admin | Updated: July 17, 2017 01:49 IST

आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून बिरुद मिरविणाऱ्या धारावी झोपडपट्टीची ओळख आता कुठे पुसली गेली आहे.

सचिन लुंगसे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून बिरुद मिरविणाऱ्या धारावी झोपडपट्टीची ओळख आता कुठे पुसली गेली आहे. तरी प्रत्यक्षात मात्र धारावीसह मुंबई शहर आणि उपनगरातील झोपड्यांच्या पुनर्विकासासह पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी विक्रोळी येथील एसआरएमधील भ्रष्टाचाराचा पाढा वाचल्यानंतर हा तिढा सुटण्याऐवजी वाढतच आहे. झोपड्यांच्या पुनर्विकासासह पुनर्वसन प्रक्रियेला मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा आणि एसआरएसारखी संबंधित सर्वच प्राधिकरणे जबाबदार असल्याचा रोष व्यक्त होत असताना या झोपड्यांतील रहिवासीही मेटाकुटीला आले आहेत.मुंबई शहरात बधवार पार्क, कवला बंदर, कोरबा मिठागर, वडाळा, वरळी, माहीम, माटुंगा, सायन, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि पश्चिम उपनगरात वांद्रे, भारतनगर, अंधेरी-सहार, पवई, साकीनाका, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरीवलीसह उर्वरित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत. बहुतांशी झोपड्या या महापालिकेच्या जागेवर, जलवाहिन्यांलगत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेवर आहेत. काही झोपड्या या केंद्र सरकारच्या जागेवर आहेत. राज्य सरकारने सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना दिलासा दिला असला तरी प्रत्यक्षात हातपाय पसरणाऱ्या झोपड्यांचे प्रमाण वाढतच आहे.मुंबईची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आणि परप्रातीयांचे लोंढे पाहता झोपड्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. परंतु वाढलेल्या झोपड्यांच्या पुनर्विकासासह पुनर्वसनाचा तिढा भविष्यात वाढतच जाणार आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील झोपड्यांची संख्या सुमारे पाच लाखांच्या घरात आहे. यापैकी एक लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. सन २००० पर्यंतच्या झोपड्यांचा विचार करता पालिकेच्या जागेवर सुमारे १ लाख १० हजार, रेल्वेच्या जागेवर १ लाख १५ हजार, राज्य सरकारच्या जागेवर २ लाख ५० हजार आणि केंद्राच्या जागेवर १ लाख १० हजार झोपड्या आहेत. मुंबईत झोपड्यांचा आकडा तुलनेत कमी-अधिक असला तरी त्यांच्या पुनर्विकासह पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. मुळात झोपड्या कोणत्याही प्राधिकरणाच्या जागेवर असल्या तरी झोपड्यांचा पुनर्विकास आणि पुनर्वसन हा मुद्दा अधांतरीच आहे. या प्रक्रियेला संबंधित प्राधिकरणे, विकासक आणि भ्रष्ट राजकारणी जबाबदार असल्याची टीका सर्वच स्तरांतून होऊ लागली आहे.अपुरी माहिती आणि अडचणकेंद्र सरकारच्या जागेवरील झोपड्यांना एसआरए लागू होत नाही, असे गृहक्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येथील झोपड्यांना राजीव गांधी आवाससारख्या योजना लागू होतात; परंतु याची माहिती संबंधित भूखंडावरील झोपडीधारकांना दिली जात नाही, किंवा झोपडीधारक ती जाणून घेण्याची तसदी घेत नाही. परिणामी एखादा विकासक पुढे आला आणि त्याने पुनर्विकासाचे काम हाती घेतल्यानंतर हा मुद्दा समोर आला तर विकासक पळ काढतो. कालांतराने दुसरा विकासक झोपडीधारकांना थातूरमातूर दिलासा देत प्रक्रियेत उतरतो. प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकारच्या भूखंडावरील झोपड्यांच्या पुनर्विकासासह पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळलेलाच राहतो.न्याय मिळेपर्यंत वेदना : अनेक एसआरए प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच भ्रष्टाचारामुळे न्यायालयात दाखल झालेले असतात. परिणामी अशा प्रकरणांत तिढा सुटण्याऐवजी वाढतच जातो. दरम्यान, अशा प्रकरणात दिलासा मिळाला तरच हे प्रकरण मार्गी लागते, अन्यथा रहिवाशांच्या वाट्याला वेदनाच येतात.कुरघोडी आणि राजकारण : मुंबई शहर आणि उपनगरात अनेक लोकप्रतिनिधींच्या ‘डेव्हलपर्स कंपन्या’ असतात. किंवा विकासकांचे राजकारण्यांशी ‘साटेलोटे’ असते. परिणामी मोक्यावरचा एसआरए प्रकल्प हाती घेण्यासाठी राजकारण्यांमध्येच चढाओढ लागते. विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरात हे प्रमाण अधिक आहे, येथे रंगलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे एसआरएचे तीनतेरा वाजतात.व्होट बँकेचा पुनर्विकासात अडथळापुनर्विकासासाठी ७० टक्के रहिवाशांची अनुमती लागते. ही अनुमती घेताना रहिवाशांना एकत्र करावे लागते. मात्र ही प्रक्रिया क्लिष्ट म्हणण्यापेक्षा अडचणीची असते. कारण अशा प्रक्रियेत रहिवाशांच्या गरजा वाढत असतात. परिणामी पुनर्विकासाची प्रक्रिया खोळंबते. खुल्या भूखंडावर वसलेल्या झोपड्यांबाबत स्पष्ट धोरण नसल्याने अडचणी वाढतात. वाढीव चटई क्षेत्रफळाबाबत रहिवाशांना आशा असते. पण ते न मिळाल्यास पुनर्विकासाला खीळ बसते. तसेच राजकारण्यांची व्होट बँक पुनर्विकासात अडथळा निर्माण करते. त्यामुळे पुनर्विकास रखडतो. पात्र-अपात्रतेचा वाद पुनर्विकास रखडण्यास कारणीभूत असतो. राजकारणी, विकासक यांना झोपड्यांचा पुनर्विकास आणि पुनर्वसन करायचे नसते तर त्यांना ‘कमाई’ करायची असते. परिणामी प्रक्रिया मार्गी लागत नाही. नव्या विकास आराखड्यामुळे यातील अडचणी वाढल्या आहेत. पुनर्विकास आणि पुनर्वसन प्रक्रियेत धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही. परिणामी सावळा गोंधळ सुरूच राहतो.- रमेश प्रभू, ज्येष्ठ वास्तुविशारदसर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू नाहीमुंबईतील झोपड्यांचा पुनर्विकास आणि पुनर्वसन रखडण्याचे कारण म्हणजे धोरणात सुस्पष्टता नाही. सत्ताधारी, विरोधक, विकासक असे सर्वच पुनर्विकास आणि पुनर्वसन रखडण्यास कारणीभूत आहेत. एकमेकांचे हितसंबंध जोपासताना राजकारणी, विकासक यांच्या केंद्रबिंदूस्थानी सर्वसामान्य माणूस राहत नाही. परिणामी हितसंबंध जोपासताना पुनर्विकास आणि पुनर्वसनाची ऐशीतैशी होते. यावर उपाय म्हणजे ‘स्वयंविकास’ हा आहे.- सीताराम शेलार, मुंबईचे अभ्यासक