शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

नाशिक, परभणी, औरंगाबादमध्ये विक्रमी कमाल तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 4:00 AM

उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली.

पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा विक्रमही मोडला गेला आहे़

औरंगाबादमध्ये ६१ वर्षापूर्वीच्या सर्वाधिक कमाल तापमानाची बरोबरी झाली आहे़ नाशिकमध्येही ६१ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला गेला़ परभणीमध्ये आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबादमध्ये ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ यापूर्वी २६ एप्रिल १९५८ रोजी ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़ तर १७ एप्रिल २०१० रोजी औरंगाबादमध्ये ४३़५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़नाशिकमध्ये उच्चांकी ४२़७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. यापूर्वी नाशिकमध्ये २४ एप्रिल १९५८ रोजी ४२़२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़ परभणी येथेही आजवरचे विक्रम मोडत ४५़२ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती़ यापूर्वी २१ व २२ एप्रिल २०१६ मध्ये ४५़१ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले होते़ तो विक्रम आज मोडला गेला़

उस्मानाबाद येथे ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ शहराच्या आजवरच्या इतिहासात हे दुसºया क्रमांकाचे तापमान आहे़ यापूर्वी तेथे २२ एप्रिल २०१६ रोजी ४३़८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़याबरोबरच अनेक शहरांमधील कमाल तापमान सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक होते. ही परिस्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे़

अकोल्यात युवकाचा बळीउष्णतेच्या लाटेचा सर्वात जास्त चटका विदर्भाला बसला आहे. जगातील उच्चांकी तापमान नोंदले गेलेल्या अकोल्यात शनिवारी उष्माघाताने एका युवकाचा मृत्यू झाला. शेषराव नामदेव जवरे असे मृताचे नाव आहे. दोन महिलांनाही उष्माघाताचा फटका बसला असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत 

जळगावचा चटका ४७ अंश सारखाउष्णतेच्या लाटेत खान्देशही भाजून निघाला असून खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार जळगावचा पारा ४७ अंशावर पोहचला होता. अधिकृत हवामान केंद्रावर ४५़ ६ अंश सेल्सियसची नोंद झाली.

चार दिवसानंतर नागपूरात ४७ डिग्रीचार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे

राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : अकोला ४६.७, अमरावती ४६, बुलडाणा ४३.३, ब्रम्हपुरी ४६.४, चंद्रपूर ४६.५, गोंदिया ४३, नागपूर ४५.३, वाशिम ४४.६, वर्धा ४६, यवतमाळ ४५.२. पुणे ४२.९, अहमदनगर ४५.१, जळगाव ४५, कोल्हापूर ३९.९, मालेगाव ४४.६, सातारा ४१.५, सोलापूर ४३.१, मुंबई ३४, रत्नागिरी ३२.६,उस्मानाबाद ४३.६, औरंगाबाद ४३.६, बीड ४४.२.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्रAkolaअकोलाNashikनाशिकparabhaniपरभणीAurangabadऔरंगाबाद