शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वाचत-वाचत, ऐकत-ऐकत ‘इत्तर गोष्टी’, पुस्तकं सांगतात गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 10:44 IST

या गोष्टी दीर्घ कथनपरतेची अपेक्षा करणाऱ्या आहेत.

एकनाथ पगार

मानवी जीवनातील मृत्यूची अटळता आणि निरंतरता, माणसांचे सामान्य जीवनव्यवहार, परंपरागत संस्कृतिदेखाव्याशी कर्मकांड म्हणून जोडून घेणं व नव्या पिढीने हे सारं नाकारणं, भाऊबंदकी- घरंदाजपणा आणि वर्तनातील विसंगती, ग्रामजीवनातले ताणेबाणे, छंद-फंद-स्वार्थीपणा आणि मृत्यूभयाने ताळ्यावर आल्यासारखं दाखवणं, लग्नसंस्था- कुटुंबसंस्था आणि कुचंबणा, फिल्मी लग्नसंस्था-कुटुंबसंस्था दुनियेतले दिखाऊ आभास त्यांची निष्प्रभता, तरुणांचे भरकटलेपण, बेरोजगारीतून बिनसलेलं तरुणांचं भावविश्व, मानवी संबंधांमधले कोतेपण अशी काही आशयसूत्रं प्रसाद कुमठेकर यांच्या ‘इत्तर गोष्टीं’मधून आविष्कृत झालेली आहेत. 

इन्सलटेड सेल्स, 'क्ष'ची गोष्ट, हॅमरशिया या गोष्टींमधील वृत्तिगांभीर्य शोक-करुणाभाव-अस्वस्थता निर्माण करणारं आहे. या गोष्टी दीर्घ कथनपरतेची अपेक्षा करणाऱ्या आहेत. आडगावचे पांडे आणि आस्मानी सुल्तानी... या गोष्टीही दीर्घ कथनरूपांचीच अपेक्षा ठेवणाऱ्या आहेत. मुंबईत पूल कोसळून अनेकांना मरण मिळालं किंवा स्कायलॅब कोसळणार म्हणून भयग्रस्त होऊन 'खरं' जगून घेऊ म्हणून गोंधळ- उत्सव करणं अशा माहितीतल्या घटना वास्तवात घडून गेलेल्या आहेत. या परिचित घटनांच्या मुळाशी जात लेखकाने तत्त्वचिंतनपर कथनरूप निर्मिलं आहे. 'क्ष'च्या गोष्टीतलं पात्रच निवेदन करतं, सामान्य माणसाच्या मरणाच्या घटनासातत्यानं मानवजातीच्या प्रारंभापासून ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अधःपतनापर्यंतचं कथाविश्व येथे आहे.  

येथील गोष्टींचे निवेदक बहुतकरून मराठवाडा - उदगिर भागातले आहेत. १९८० नंतरचं तरुणांचं भावविश्व, तरुणाईची स्वप्नं शहरातील नव्या बाजारू आणि फिल्मी स्वप्नाळू वास्तवाशी सांधेजोड करू पाहत आहेत असं वाटतं. विसाव्या शतकाची अखेर आणि एकविसाव्या शतकातील दिखाऊ प्रगती यांच्यातल्या घुसमट-कुसपटांशी या निवेदकांना / पात्रांना संघर्षही करावा लागत आहे. स्वीकारशील व्यक्तित्वे निरुपायाने या निवेदकांना/पात्रांना स्वीकारावी लागली आहेत, तरीही जात-धर्म-कुटुंब-संस्कार-भाऊबंदकी-नाती-समाज यांबद्दलच्या त्यांच्या भावना / आस्था क्षीण का होईना बंडखोरीच्या आहेत. पितृसंस्था-परंपरागत कर्मकांड-धर्मसमजुती यांबाबतीत या तरुण पिढीतील युवकांना विसंवादी प्रतिसाद द्यावेसे वाटतात, तसे ते देतातही ! चित्रपट-नट-नट्या, त्यांतील विवाहांचे छद्म-रंजनही काहींना आवडतं. वास्तवाच्या प्रखरतेला स्वप्नाळूपणे कुरवाळण्यासाठी चित्रपट-गीतं-दृश्य-किस्से यांचा आश्रयही काही कथांमध्ये आहे.

माणसांचं जगणं-वागणं, बोलणं-परंपराबद्ध असणं, परंपरा मोडू पाहणं, गंभीर राहणं, मरणं, हसणं अशा विविध परींचा संमिश्र कथानुभव येथे मिळतो. काही गोष्टी गंभीर भावावस्था निर्माण करतात तर काही गमतीदार माणसं, परिस्थिती यांची खिल्ली उडवतात. एका हुशार आणि गंभीर प्रकृतीच्या निवेदकाच्या कचाट्यात सापडल्याचा अनुभव मिळतो. 

ऐकत राहावं, वाचत राहावं आणि मुख्य म्हणजे समाज, माणसं, परिस्थिती यांच्या विचारात पडावं असेही या गोष्टींचे अनुभव येतात, दरएक वाचनात पुन्हा पुन्हा काही जगणं-हसणं-स्थिरावणं जसं घडतच राहतं... गोष्टींचा कथनप्रवाह सुरूच असतो. भेटलेल्या, अनुभवलेल्या माणसांमध्ये लेखकाला गोष्टी दिसतात, दिसत राहतील. ऐकणं-वाचणंही त्यामुळे अप्रतिहत सुरू राहणार.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र