शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शेतकऱ्यांसाठी आरबीआयची खुशखबर...विनातारण कर्ज मर्यादा 60 हजारांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 5:28 PM

शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची रक्कम 2010 मध्ये 1 लाख करण्यात आली होती.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यानंतर शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी दिली आहे. कोणतीही गॅरंटी न देता शेतीकर्जाची मर्यादा 1 लाखांवरून 1.6 लाख केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यापुढे 1.60 लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही वस्तू किंवा जमीन तारण ठेवावे लागणार नाही. गुरुवारी आरबीआयने याबाबतची घोषणा केली. याचा फायदा खासकरून अशा शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही. 

शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची रक्कम 2010 मध्ये 1 लाख करण्यात आली होती. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढलेला खर्च लक्षात घेतला आहे. याबाबतची सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. तसेच शेती कर्जाशी संबंधीत प्रकरणांच्या पाहणीसाठी एक समितीही बनविण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारने नुकतेच 5 एकर शेतजमीन असलेल्यांना 6 हजार रुपये वार्षिक मदत देण्याचे जाहीर केले होते. तसेच किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच कर्ज वेळेत भरल्यास 3 टक्क्यांचे व्याज माफ होणार आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक