शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

रयत शिक्षण संस्थेनं सांगितलं कर्मवीरांचं ब्रीद, चंद्रकांत पाटलांच्या विधानाचाही निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 9:52 AM

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध रयत संस्थेनं केला. त्यासोबतच, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कशारितीने शिक्षणासाठी पैसा उभारला, यांची इतंभू माहितीही दिली

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील बहुजन समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचाच राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. आता, रयत शिक्षण संस्थेनंही प्रेस नोट जारी करत चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. 

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध रयत संस्थेनं केला. त्यासोबतच, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कशारितीने शिक्षणासाठी पैसा उभारला, यांची इतंभू माहितीही दिली. तसेच, कर्मवीरांनी विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हे ब्रीद दिलं, भीक मागून शिक्षण न करता, स्वावलंबी होऊन शिक्षण घेण्याचा मंत्र दिला. म्हणूनच, 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे या संस्थेचं ब्रीदवाक्य कर्मवीरांनी दिलंय विशेष म्हणजे येथील कमवा आणि शिका योजनेची जागतिक पातळीवर दखलही घेतली गेली, असेही रयत शिक्षण संस्थेनं सांगितलं आहे. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १०३ वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे, ही दूरदृष्टी भाऊराव यांची होती. म्हणूनच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. किर्लोस्कर, ओगले, कपूर या कंपनींमध्ये कर्मवीरांनी जे काम केलं. या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न, शेतीच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स, आई-वडिलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोनं, मंगळसुत्रसुद्धा कर्मवीर भाऊरावांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केलं, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेकडून देण्यात आली. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी हे पत्र ट्विटरवरुन शेअर केले आहे.  

काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस

खरे म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा शब्द चुकला असेल, तरी त्यांच्या वाक्यातील आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, पूर्ण वाक्याचा आशय न दाखवता, केवळ चुकीचा शब्द दाखवणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जी लोकं अशाप्रकारचे कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकले पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले आहे, जो शब्द खटकणारा आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय आणि माफीदेखील मागितली आहे. त्यानंतरही त्यांना टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Rayat Educational Instituteरयत शिक्षण संस्थाchandrakant patilचंद्रकांत पाटीलEducationशिक्षणMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडा