शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

रत्नागिरी : बावनदीतून ३७ गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 15:29 IST

रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यावर उपाय म्हणून १३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या मि-या, कुवारबाव, शिरगाव, निवळीसह ३७ महसुली गावांसाठी सुमारे ९० कोटी खर्चाची प्रादेशिक नळपाणी योजना बावनदीतील पाण्याचा वापर करून राबविली जाणार आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाकडून आवश्यक सर्वेक्षण सुरू झाले आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यावर उपाय म्हणून १३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या मि-या, कुवारबाव, शिरगाव, निवळीसह ३७ महसुली गावांसाठी सुमारे ९० कोटी खर्चाची प्रादेशिक नळपाणी योजना बावनदीतील पाण्याचा वापर करून राबविली जाणार आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाकडून आवश्यक सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या तीन महिन्यात या प्रादेशिक योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडून शासनाकडे पाठवला जाणार आहे.ही ३७ महसुली गावे रत्नागिरी नगर परिषदेच्या जवळच्या परिसरात वसलेली असल्याने येथील लोकसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. सध्या रत्नागिरी नगर परिषदेची लोकसंख्या ७७ हजार आहे. या ३७ गावांमध्ये २०११च्या जनगणनेनुसार ७६ हजार ६८९ एवढी लोकसंख्या आहे. सन १९३५मध्ये ही लोकसंख्या १ लाख ११ हजार ६३७ असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. या गावांची पाण्याची मागणीही मोठी आहे. ही मागणी बावनदीतील मुबलक पाणी साठ्यामुळे पूर्ण  होऊ शकेल. या योजनेचे सर्वेक्षण, अंदाजपत्रके व आराखडे यांची महाराष्टÑ जीवन प्राधिकरणमार्फत पूर्तता व्हावी, असा ठराव जिल्हा परिषदेने ६ जून २०१७ रोजी केला होता. याबाबत २१ नोव्हेंबर २०१७ रोजी आमदार सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. १३ गु्रप ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या ज्या ३७ गावांना या प्रादेशिक नळपाणी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये मि-या, जाकीमि-या, सडामिºया, शिरगाव, आडी, तिवंडेवाडी, झाडगाव, मुसलमानवाडी, निवळी, रावणंगवाडी, धनावडेवाडी, काजरेकोंड, कपिलनगर, करबुडेकोंड, कुंभारवाडा, मूळगाव, वेद्रेवाडी, डांगेवाडी, हातखंबा, तारवेवाडी, पानवल, घवाळेवाडी, खेडशी, गयाळवाडी, पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी, कुवारबाव, मिरजोळे, मधलीवाडी, ठिकाणवाडी, पाडावेवाडी, शीळ, नाचणे, आंबेशेत, कर्ला, मुसलमानवाडी, जुवे या महसुली गावांचा समावेश आहे. या योजनेचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल सन २०१८-१९ च्या कृती आराखड्यात करण्यात आला आहे. या ३७ पैकी अनेक महसुली गावांमध्ये नळपाणी योजना आहेत. त्यातील काही योजनांना एमआयडिसीकडून पाणी पुरवठा केलो जात आहे. तर काही योजना काही धरणांवर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

तारांगणसाठी ७ कोटी : रत्नागिरी योजनेबाबत आठवडाभरात निर्णयरत्नागिरी नगर परिषदेच्या नळपाणी योजनेचा निर्णय आठवडाभरात होईल. शहरात सव्वा कोटीच्या तारांगण प्रकल्पाला ७ कोटी मंजूर झाले आहेत. गणपतीपुळे आराखड्यासाठी २० कोटी तरतूद झाली आहे. जिल्ह्यातील जलसंधारणच्या १२ प्रकल्पांची रखडलेली कामे सुरू होणार आहेत. भगवती बंदर ब्रेक वॉटरवॉल ७५० मीटर लांबीची होणार असून, त्यासाठी १३० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. जयगड नळपाणी योजनेसाठी २७ कोटी मंजूर झाले आहेत. यासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी