शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

रत्नागिरी : बावनदीतून ३७ गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 15:29 IST

रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यावर उपाय म्हणून १३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या मि-या, कुवारबाव, शिरगाव, निवळीसह ३७ महसुली गावांसाठी सुमारे ९० कोटी खर्चाची प्रादेशिक नळपाणी योजना बावनदीतील पाण्याचा वापर करून राबविली जाणार आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाकडून आवश्यक सर्वेक्षण सुरू झाले आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यावर उपाय म्हणून १३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या मि-या, कुवारबाव, शिरगाव, निवळीसह ३७ महसुली गावांसाठी सुमारे ९० कोटी खर्चाची प्रादेशिक नळपाणी योजना बावनदीतील पाण्याचा वापर करून राबविली जाणार आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाकडून आवश्यक सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या तीन महिन्यात या प्रादेशिक योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडून शासनाकडे पाठवला जाणार आहे.ही ३७ महसुली गावे रत्नागिरी नगर परिषदेच्या जवळच्या परिसरात वसलेली असल्याने येथील लोकसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. सध्या रत्नागिरी नगर परिषदेची लोकसंख्या ७७ हजार आहे. या ३७ गावांमध्ये २०११च्या जनगणनेनुसार ७६ हजार ६८९ एवढी लोकसंख्या आहे. सन १९३५मध्ये ही लोकसंख्या १ लाख ११ हजार ६३७ असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. या गावांची पाण्याची मागणीही मोठी आहे. ही मागणी बावनदीतील मुबलक पाणी साठ्यामुळे पूर्ण  होऊ शकेल. या योजनेचे सर्वेक्षण, अंदाजपत्रके व आराखडे यांची महाराष्टÑ जीवन प्राधिकरणमार्फत पूर्तता व्हावी, असा ठराव जिल्हा परिषदेने ६ जून २०१७ रोजी केला होता. याबाबत २१ नोव्हेंबर २०१७ रोजी आमदार सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. १३ गु्रप ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या ज्या ३७ गावांना या प्रादेशिक नळपाणी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये मि-या, जाकीमि-या, सडामिºया, शिरगाव, आडी, तिवंडेवाडी, झाडगाव, मुसलमानवाडी, निवळी, रावणंगवाडी, धनावडेवाडी, काजरेकोंड, कपिलनगर, करबुडेकोंड, कुंभारवाडा, मूळगाव, वेद्रेवाडी, डांगेवाडी, हातखंबा, तारवेवाडी, पानवल, घवाळेवाडी, खेडशी, गयाळवाडी, पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी, कुवारबाव, मिरजोळे, मधलीवाडी, ठिकाणवाडी, पाडावेवाडी, शीळ, नाचणे, आंबेशेत, कर्ला, मुसलमानवाडी, जुवे या महसुली गावांचा समावेश आहे. या योजनेचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल सन २०१८-१९ च्या कृती आराखड्यात करण्यात आला आहे. या ३७ पैकी अनेक महसुली गावांमध्ये नळपाणी योजना आहेत. त्यातील काही योजनांना एमआयडिसीकडून पाणी पुरवठा केलो जात आहे. तर काही योजना काही धरणांवर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

तारांगणसाठी ७ कोटी : रत्नागिरी योजनेबाबत आठवडाभरात निर्णयरत्नागिरी नगर परिषदेच्या नळपाणी योजनेचा निर्णय आठवडाभरात होईल. शहरात सव्वा कोटीच्या तारांगण प्रकल्पाला ७ कोटी मंजूर झाले आहेत. गणपतीपुळे आराखड्यासाठी २० कोटी तरतूद झाली आहे. जिल्ह्यातील जलसंधारणच्या १२ प्रकल्पांची रखडलेली कामे सुरू होणार आहेत. भगवती बंदर ब्रेक वॉटरवॉल ७५० मीटर लांबीची होणार असून, त्यासाठी १३० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. जयगड नळपाणी योजनेसाठी २७ कोटी मंजूर झाले आहेत. यासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी