शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:28 IST

"यांच्या विजय मेळाव्याला काही अर्थनाही, हा मेळावा तर..."

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मु्द्द्यावरून आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास अठावले यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, दोघेही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. मराठी सर्वांनाच बोलता यायला हवी, हेही खरेच आहे.

महाविकास अघाडीत फूट पडेल - रामदास आठवले यांनी दावा केला की, "दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने आमच्या महायुतीलाच (एनडीए) अधिक फायदा होईल. कारण महाविकास आघाडीमध्ये (एमव्हीए) फूट पडेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (सपा) वेगळे राहतील. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल. कारण,आपल्याला सोबत चालायचे असेल, तर इतर कुणाचीही आवश्यकता नाही, असे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे."

'बघूया किधीपर्यंत सोबत राहतात...' -IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, "दोघेही एकत्र आले आहेत. बघूया किती दिवस सोबत राहतात. अद्याप केवळ मराठीच्याच मुद्द्यावर एक आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते, मात्र, तिची हवा काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. रॅलीपूर्वीच फडणवीस यांनी शाळेत हिंदी शिकवण्याचा जो सरकारी आदेश काढण्यात आला होता, तो रद्द केला आहे."

यांच्या विजय मेळाव्याला काही अर्थनाही, हा मेळावा तर... -रामदास अठावले पुढे म्हणाले, "यांच्या विजय मेळाव्याला काही अर्थनाही, हा मेळावा तर आम्ही करायला हवा होता. महायुती सरकारने तो सरकारी आदेश रद्द केला आहे. मात्र यांना वाटते की, आपल्या रॅलीमुळेच हा जीआर रद्द केला आहे, मात्र असे नाही. सर्व मराठी लोकांच्या भावना लक्षात घेत आमच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. दोघे भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरेंकडे आता शिवसेना नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. यामुळे अधिकांश लोक एकनाथ शिंदेंसोबत आहेत.40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले."

"राज ठाकरेंकडे एकही आमदार नाही" -या बरोबर, "राज ठाकरे यांच्या मोठ-मोठ्या सभा होतात. ही फार चांगली गोष्ट आहे. ते वक्ता म्हणून राज ठाकरे हे एक जबरदस्त नेते आहेत.मात्र, त्यांना मते मिळत नाहीत. सध्या त्यांचा एकही आमदार नाही. एकेकाळी १३ आमदार निवडून आले होते. दोघांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही. जर काही फरक पडलाच, तर तो महाविकास आघाडीलाच पडेल," असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना