शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:28 IST

"यांच्या विजय मेळाव्याला काही अर्थनाही, हा मेळावा तर..."

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मु्द्द्यावरून आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास अठावले यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, दोघेही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. मराठी सर्वांनाच बोलता यायला हवी, हेही खरेच आहे.

महाविकास अघाडीत फूट पडेल - रामदास आठवले यांनी दावा केला की, "दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने आमच्या महायुतीलाच (एनडीए) अधिक फायदा होईल. कारण महाविकास आघाडीमध्ये (एमव्हीए) फूट पडेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (सपा) वेगळे राहतील. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल. कारण,आपल्याला सोबत चालायचे असेल, तर इतर कुणाचीही आवश्यकता नाही, असे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे."

'बघूया किधीपर्यंत सोबत राहतात...' -IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, "दोघेही एकत्र आले आहेत. बघूया किती दिवस सोबत राहतात. अद्याप केवळ मराठीच्याच मुद्द्यावर एक आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते, मात्र, तिची हवा काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. रॅलीपूर्वीच फडणवीस यांनी शाळेत हिंदी शिकवण्याचा जो सरकारी आदेश काढण्यात आला होता, तो रद्द केला आहे."

यांच्या विजय मेळाव्याला काही अर्थनाही, हा मेळावा तर... -रामदास अठावले पुढे म्हणाले, "यांच्या विजय मेळाव्याला काही अर्थनाही, हा मेळावा तर आम्ही करायला हवा होता. महायुती सरकारने तो सरकारी आदेश रद्द केला आहे. मात्र यांना वाटते की, आपल्या रॅलीमुळेच हा जीआर रद्द केला आहे, मात्र असे नाही. सर्व मराठी लोकांच्या भावना लक्षात घेत आमच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. दोघे भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरेंकडे आता शिवसेना नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. यामुळे अधिकांश लोक एकनाथ शिंदेंसोबत आहेत.40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले."

"राज ठाकरेंकडे एकही आमदार नाही" -या बरोबर, "राज ठाकरे यांच्या मोठ-मोठ्या सभा होतात. ही फार चांगली गोष्ट आहे. ते वक्ता म्हणून राज ठाकरे हे एक जबरदस्त नेते आहेत.मात्र, त्यांना मते मिळत नाहीत. सध्या त्यांचा एकही आमदार नाही. एकेकाळी १३ आमदार निवडून आले होते. दोघांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही. जर काही फरक पडलाच, तर तो महाविकास आघाडीलाच पडेल," असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना