शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

"रामदास आठवले हे भाजपाच्या झाडावरचं बांडगुळ”, मनसे नेते प्रकाश महाजन यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 20:29 IST

Prakash Mahajan Criticize Ramdas Athawale: मी महायुतीसोबत असताना राज ठाकरे यांची महायुतीला आवश्यकता नाही? असं विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रमुख रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावरून आता मनसेकडून रामदास आठवले यांच्यावर बोचरी टीका करण्यात येत आहे.

मी महायुतीसोबत असताना राज ठाकरे यांची महायुतीला आवश्यकता नाही? असं विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रमुख रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावरून आता मनसेकडूनरामदास आठवले यांच्यावर बोचरी टीका करण्यात येत आहे. दरम्यान, रामदास आठवले हे भाजपाच्या झाडावरचं बांडगुळ आहे, असं विधान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन रामदास आठवलेंवर निशाणा साधताना म्हणाले की, रामदास आठवले यांनी असं विधान प्रसारमाध्यमांसमोर करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करावी. आमचे हिंदुत्वाचे विचार सारखेच असल्याने आम्ही राज ठाकरेंच्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबत घेण्याबाबत विचार करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. रामदास आठवलेजी तुमचा पूर्ण आदर करून सांगतो की, गोपिनाथ मुंडे यांनी तुम्हाला भाजपाच्या झाडाखाली आणलं. तुम्ही त्या झाडावर चढलात आणि आता तुम्ही त्या झाडाचं एक बांडगुळ आहात. तुमच्यामुळे भाजपाला काहीही फायदा नाही. मात्र भाजपामुळे तुम्ही अखंड मंत्रिपदावर आहात, हे रामदास आठवले यांनी लक्षात घ्यावं. तसेच तुम्ही काचेच्या घरात आहात याचा विचार करावा. रामदास आठवले यांच्याबाबत पूर्ण आदर ठेवून मी हे विधान करत आहे कारण त्यांनी माझ्या नेत्यावर टीका केली आहे, अशे प्रकाश महाजन म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका करताना रामदास आठवले म्हणाले होते की, "पुढे याबाबत काय निर्णय होणार आहे हे मला माहिती नाही. पण महायुतीमध्ये राज ठाकरे यांना घेण्यामध्ये अजिबात फायदा नाही. त्यांची हार्ड लाईन असल्यामुळे त्यांचा विशेष आपल्याला फायदा होणार नाही. मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे? त्यामुळे त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही त्यांना बरोबर घ्याल पण ते येतील की नाही माहिती नाही. महापालिकेच्या निवडणुकीत काय निर्णय होईल मला माहिती नाही. पण महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा फायदा होऊ शकतो. काही ठिकाणी त्यांचा थोडा उपयोग होऊ शकतो. काय निर्णय घ्यायचा तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील. माझं व्यक्तिगत मत आहे की, त्यांना सोबत घेतल्याने महायुतीचे नुकसानचं होणार आहे," असा टोला रामदास आठवले यांनी लगावला होता. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे