शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 18:07 IST

महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह अन्य विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्रकोरोना परिस्थितीवरून साधला निशाणारामदास आठवले यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना या प्रकरणी झालेली अटक, आधी परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) आणि नंतर सचिन वाझे यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह अन्य विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच आता रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (ramdas athawale criticised thackeray govt over various issues)

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या पब, बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप करत परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणी महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राजीनामा द्यावा लागेल, असा हल्लाबोल रामदास आठवले यांनी केला आहे. 

तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी; जयंत पाटलांना सदाभाऊंचा टोला

अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जातील

माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुखांवर लावला आहे. देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सरकारमधले सर्व मंत्री राजीनामा देतील आणि शेवटी उद्धव ठाकरे यांनाही राजीनामा द्यावा लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

म्हणून राज्यात कोरोना रुग्णवाढ

ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, गर्दी जास्त होत आहे, अशा ठिकाणी लॉकडाऊन लागू करायला हवा. मजुरांना याचा फटका बसता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. पण राज्य सरकारने योग्य ती पाऊले उचलली नाहीत म्हणून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. 

“पुढे काय परिस्थिती असेल, आता सांगता येत नाही, आढावा घेऊन निर्णय घेणार”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत व्यक्त केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुख