शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 18:07 IST

महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह अन्य विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्रकोरोना परिस्थितीवरून साधला निशाणारामदास आठवले यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना या प्रकरणी झालेली अटक, आधी परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) आणि नंतर सचिन वाझे यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह अन्य विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच आता रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (ramdas athawale criticised thackeray govt over various issues)

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या पब, बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप करत परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणी महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राजीनामा द्यावा लागेल, असा हल्लाबोल रामदास आठवले यांनी केला आहे. 

तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी; जयंत पाटलांना सदाभाऊंचा टोला

अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जातील

माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुखांवर लावला आहे. देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सरकारमधले सर्व मंत्री राजीनामा देतील आणि शेवटी उद्धव ठाकरे यांनाही राजीनामा द्यावा लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

म्हणून राज्यात कोरोना रुग्णवाढ

ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, गर्दी जास्त होत आहे, अशा ठिकाणी लॉकडाऊन लागू करायला हवा. मजुरांना याचा फटका बसता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. पण राज्य सरकारने योग्य ती पाऊले उचलली नाहीत म्हणून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. 

“पुढे काय परिस्थिती असेल, आता सांगता येत नाही, आढावा घेऊन निर्णय घेणार”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत व्यक्त केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुख