शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

मनसेने पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दादागिरी दाखवावी- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 16:21 IST

मनसेने फेरीवाल्यांच्या मुद्यावर आक्रमक होऊन काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे अयोग्य आहे. मनसेने आपली दादागिरी ही पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दाखवावी, असा टोला केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. 

ठळक मुद्देमनसेने फेरीवाल्यांच्या मुद्यावर आक्रमक होऊन काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे अयोग्य आहे. मनसेने आपली दादागिरी ही पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दाखवावी, असा टोला केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. मु्ंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त टोला मनसेला लगावला आहे.

कल्याण- मनसेने फेरीवाल्यांच्या मुद्यावर आक्रमक होऊन काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे अयोग्य आहे. मनसेने आपली दादागिरी ही पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दाखवावी, असा टोला केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. 

मु्ंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त टोला मनसेला लगावला आहे.  फेरीवाल्यांच्या बाजू घेताना काँग्रसचे संजय निरुपम यांनी कायदा हाती घेऊ नये. तसेच मनसेनेही फेरीवाला प्रश्नी कायदा हाती घेऊ नये असंही आवाहन काँग्रेस व मनसेला रामदार आठवले यांनी केलं आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नी महापालिका व राज्य सरकारने लवकरच नियोजन करावे आणि फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी सूचना केली आहे. 

मुंबईतील एका कार्यक्रमात मुंबईच्या उभारणीत उत्तर भारतीयांचा सहभाग आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यावर मनसेने मुख्यमंत्र्यांना भैयाभूषण पुरस्कार द्यावा असं वक्तव्य केलं. याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, मुंबईच्या उभारणीत उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांचा सहभाग आहे. चणे विकणारा, पाणी पुरी विकणाऱ्याच्या मुंबईच्या उभारणीत सहभाग आहे. या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. मनसेने मुख्यमंत्र्यांना भैयाभूषण पुरस्कार देण्याऐवजी मराठी भूषण पुरस्कार द्यावा. मुख्यमंत्री हे नागपूरचे आहेत. शिवाय ते मराठी आहे. त्यामुळे त्यांना मराठीभूषण पुरस्कार मनसेने दिल्यास हा मनसेचाच गौरव असेल. मनसेने भैयाभूषण पुरस्कार देण्याची भाषा केली असल्याने मनसेला आठवले भूषण पुरस्कार देण्यास काय हरकत आहे असे ही त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीत मिश्कीलपणे सांगितलं.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSanjay Nirupamसंजय निरुपमcongressकाँग्रेस