शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

MLC Election Result 2018: चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे रामदास आंबटकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 15:25 IST

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर (५२८) यांनी ३७ मतांनी काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ (४९२) यांच्यावर विजय संपादन केला.

चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर (५२८) यांनी ३७ मतांनी काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ (४९२) यांच्यावर विजय संपादन केला. दोन्ही अपक्षांनी पाठिंबा दर्शविलेला असल्यामुळे त्यांना एकही मत मिळाले नाही. ३६ मते अवैध ठरली तर एक मत बाद ठरले. मतांचा कोटा ५१० झाल्याने पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजप उमेदवार रामदास आंबटकर यांना गुरुवारी येथील नियोजन भवनात झालेल्या मतमोजणीअंती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी विजयी घोषित केले. रामदास आंबटकर विजयी मुद्रेत बाहेर येताच वर्धाचे खासदार रामदास तडस, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, हिंगणघाट आमदार समीर कुणावार, गडचिरोलीचे जिल्ह्यातील आमदार देवराव होळी, क्रिष्णा गजभिये, आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे, चंद्रपूर जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महापौर अंजली घोटेकर, भाजपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा यांनी विजयी निशाणी दाखविली.सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यानंतर उमेदवारनिहाय मतांचे विभाजन करतानाच आंबटकर हे पहिल्या फेरीत ५५८ मते घेऊन विजयी झाल्याची चर्चा बाहेर आली. यानंतर भाजपाच्या गोटात आनंदाची लहर पसरली. यानंतर सुमारे अर्ध्या तासाने प्रत्यक्ष मतमोजणीत भाजपा उमेदवार आंबटकर यांना ५२८, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाल्याची वार्ता बाहेर येताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत विजयी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली. या निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान घेण्यात आले. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील १०५९ पैकी १०५६ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये नगर परिषद व नगरपंचायत नगरसेवक, जि.प. सदस्य, महापौर, नगराध्यक्ष व पंचायत समिती सभापतींचा समावेश होता. मतदानाची टक्केवारी ९९.७२ इतकी होती. या अनुषंगाने पहिल्या पसंतीची ५२८ मते घेणारा उमेदवार विजयी होणार होता. मात्र मतमोजणीत तब्बल ३६ मते अवैध ठरली आणि एक मत बाद झाल्याने ५१० मतांचा विजयाचा कोटा झाला. यामध्ये पहिल्या पसंतीची मते मोजणीतच भाजप उमेदवाराने ५२८ मते घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केले, तर काँग्रेस उमेदवाराला ४९१ मतांपर्यंत मजल मारला आली.मतमोजणीपूर्वी भाजप उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वास भाजप गोटातून व्यक्त केला जात होता. तर काँग्रेसही विजयाचा दावा करीत होती. निवडणुकीच्या निकालात भाजप उमेदवार विजयी झाला असला तरी काँग्रेसची मते कमालीची वाढली आहे. काँग्रेस २४९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ७१ मते मिळून केवळ ३२० मतांचा आकडा काँग्रेस आघाडीकडे होता. भाजपकडे ४८३ मते होती. शिवसेना ४५, अपक्ष व अन्यची मते तब्बल २११ होती. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांपेक्षाही भाजपकडे मजबूत संख्याबळ होते. विजयासाठी ५२८ मतांचीच गरज होती.भाजपला अपक्ष व अन्यची मते मिळतील, असा विश्वास होता. मात्र ही मते काँग्रेस उमेदवारांच्या पारड्यात पडल्याने  निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. काँग्रेस उमेदवार सराफ हे वर्धा शिवसेना जिल्हा प्रमुख राजू सराफ यांचे वडिल असल्यामुळे काँग्रेसचा शिवसेनेच्या मतांवर डोळा होता. भाजपचे ४८३ आणि शिवसेनेचे ४५ मते मिळून ५२८ मते होतात. आणि भाजपला मिळालेली मतेही ५२८ इतकीच आहे. यावरून शिवसेनेचे एकही मत फुटल्याचे दिसून येत नाही. या मतांच्या आधारावरच भाजपने गेल्या निवडणुकीत मितेश भांगडिया यांच्या रुपाने हिसकावलेला काँग्रेसचा गड राखण्यात यश मिळविले. निवडणूक प्रक्रियेमध्ये वर्धा निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, गडचिरोली निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे व उपविभागीय अधिकाऱ्यांनी काम पाहिले.

टॅग्स :ElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषदPoliticsराजकारण