शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Rajyasabha Election: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार अडचणीत? काँग्रेसच्या त्या निर्णयामुळे टेन्शन वाढलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 5:49 PM

Rajyasabha Election Maharashtra: निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांकडे नसल्याने छोटे पक्ष अपक्षांवर त्यांची मदार आहे. त्यात शिवसेनेकडून ज्या मित्रपक्षांच्या विश्वासावर दुसऱ्या उमेदवाराच्या विजयाच्या हालचाली सुरू होत्या, त्यालाच आता मोठा धक्का बसताना दिसत आहे.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीत भाजपाचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तर भाजपाचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये सहाव्या जागेसाठी चुरस आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांकडे नसल्याने छोटे पक्ष अपक्षांवर त्यांची मदार आहे. त्यात शिवसेनेकडून ज्या मित्रपक्षांच्या विश्वासावर दुसऱ्या उमेदवाराच्या विजयाच्या हालचाली सुरू होत्या, त्यालाच आता मोठा धक्का बसताना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी सेफ गेम खेळण्याची तयारी काँग्रेसने केली असून, आपला एकमेवर उमेदवार निवडून आणण्यावर काँग्रेसचा भर असेल.

काँग्रेसने राज्यसभेमध्ये इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ४४ आमदार असून, विजयी होण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या उमेदवाराला आवश्यक ४२ मते दिल्यानंतर काँग्रेसकडे अतिरिक्त दोन मतं उरतात. मात्र निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून ४२ मतांऐवजी आपल्या उमेदवाराला ४४ मतांचा सुरक्षित कोटा देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे काँग्रेसची दोन अतिरिक्त मतं शिवसेना उमेदवाराच्या खात्यात जाण्याची शक्यता फार कमी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची बेगमी करताना शिवसेनेची दमछाक होण्याची शक्यता आहे.

सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून २६ अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित १६ मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची २२ अतिरिक्त मतं असून, अन्य ७ आमदारांचा पाठिंबा धरता एकूण २९ मते आहेत. उर्वरित १३ मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसSanjay Pawarसंजय पवार