शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

RajyaSabha Election Maharashtra: तेव्हाची गोष्ट वेगळी होती; काँग्रेसचा उमेदवार पडल्यावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:41 IST

इम्रान प्रतापगढी हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. काहीही झाले तरी प्रतापगढींना निवडून आणा, असा स्पष्ट निरोप काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला आहे.

भाजपाने सरकार अस्थिर करण्याची, आमदारांना अस्थिर करण्यासाठी राज्यसभेची निवडणूक लादल्याचा आरोप शिवसेना नेते आणि राज्यसभा उमेदवार संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच मविआचे नेते फडणवीसांना भेटण्यासाठी गेले होते, असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले. 

निवडणूक लादली गेली आहे. निवडणुका आल्या की बैठका होत असतात. आम्हाला राज्यसभेबरोबरच २० जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीचीही आताच तयारी करावी लागेल, असेही राऊत यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसचा उमेदवार पडला होता, यावर विचारले असता राऊत यांनी तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा गुप्त पद्धतीने मतदान होत होते. आता पक्ष प्रतोदाला आपले मत दाखवून ते टाकावे लागते. यामुळे तेव्हा जसा प्रकार घडला तो आता घडणे शक्य नाही, असेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदारांची चांगली चर्चा झाली, असेही राऊत म्हणाले. 

इम्रान प्रतापगढी हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. काहीही झाले तरी प्रतापगढींना निवडून आणा, असा स्पष्ट निरोप काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला आहे. यामुळे आपल्या आमदारांवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने शिवसेनेवर उमेदवार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. यातच प्रतापगढी यांची उमेदवारी लादल्याने राज्यातील काँग्रेस नेते नाराज आहेत. यामुळे हे नाराज आमदार फुटण्याची दाट शक्यता काँग्रेसला वाटत आहे. यामुळे राज्यसभेची एक जागा महत्वाची की राज्यातील सत्ता, असा सूचक इशाराच काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला देण्यास सुरुवात केली आहे. या पेचात अडकल्यानेच शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आज लगबगीने फडणवीसांच्या बंगल्यावर गेले होते. परंतू तिथेही त्यांना नकार मिळाल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

आता अर्ज भरण्याची मुदत संपल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन्ही बाजूने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत आहेत. आमच्याकडे तिसऱ्या उमेदवारासाठी ३० मते जादा आहेत. त्यामुळे आता अपक्ष, इतर पक्षांच्या मदतीवर आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा