शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Rajya Sabha Election: अपक्ष आमदार ठरवणार सहावा खासदार; कुणाची विकेट काढणार?... वाचा, कसं होईल मतदान

By यदू जोशी | Updated: May 30, 2022 17:10 IST

भाजपाचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक उमेदवार पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील. सातपैकी विकेट कोणाची पडेल? महाडिकांची की संजय पवारांची की आणखी कोणाची?

>> यदु जोशी

मुंबई - राज्यसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे नक्की दिसत आहे. कारण, महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाचे आहेत सहा खासदार आणि उमेदवार आहेत सात. याचा अर्थ चुरस होणार हे नक्की. भाजपने तीन, शिवसेनेने दोन, राष्ट्रवादीने एक आणि काँग्रेसने एक उमेदवार दिला आहे. सहाव्या जागेसाठी घमासान होईल. घोडेबाजाराला ऊत येऊ शकतो. 

भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्यातील माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्यासोबतच धनंजय महाडिकांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिला आहे. शिवेसनेचे संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसने उत्तर प्रदेशातून आणून संधी दिलेले इम्रान प्रतापगडी या सात उमेदवारांपैकी सहा जिंकतील, एकाला घरी बसावे लागेल. सातपैकी विकेट कोणाची पडेल? महाडिकांची की संजय पवारांची की आणखी कोणाची? भाजपाचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक उमेदवार पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील. 

महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; भाजप उमेदवार धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा

राज्यसभेची ही निवडणूक गुप्त मतदानाने होत नाही.  प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्याच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावे लागते आणि नंतरच ते मतपेटीत टाकावे लागते. पक्षाने ज्या उमेदवाराला मत द्या म्हणून व्हिप जारी केलेला असतो त्याच उमेदवाराला मतदान करावे लागते आणि तसे केले नाही तर तुमची आमदारकी जाऊ शकते. मग या निवडणुकीत घोडेबाजाराला संधी आहे कुठे? तर ती आहे अपक्ष आमदारांच्याबाबत. राज्यातील सर्व अपक्ष आमदार हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. मात्र, आपल्या सहयोगी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखविण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. उलटपक्षी अपक्ष आमदाराने मत दाखवू नये, असा नियम असल्याचे सांगितले जाते. इथेच घोडेबाजाराला संधी आहे.

“रोहित पवार आमचा पक्ष फोडतायत, शरद पवारांकडे तक्रार करेन”; शिवसेना नेत्याचा इशाराभाजपच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रात तिसरा उमेदवार देताना तो निवडून येण्याची 'सोय' करूनच दिला असेल असे म्हटले जात आहे. तसे असेल तर, शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे अडचणीत येऊ शकतात. आ.हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, शेकाप, एमआयएम, कम्युनिस्ट, मनसे हे लहान पक्ष आणि अपक्ष काय करतील यावर सहाव्या जागेचा निकाल अवलंबून असेल. केवळ पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजपकडे दोन जागा जिंकून सर्वाधिक अतिरिक्त मते आहेत. त्या खालोखाल शिवसेनेकडे व नंतर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते आहेत. काँग्रेसकडे केवळ दोन अतिरिक्त मते आहेत. भाजपचे पीयूष गोयल, डॉ.अनिल बोंडे, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे  प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान  प्रतापगडी यांना कोणताही धोका दिसत नाही. भाजपचे धनंजय महाडिक की शिवसेनेचे संजय पवार हा या निवडणुकीतील औत्सुक्याचा बिंदू आहे.

राज्यातून राज्यसभेसाठी रिंगणात कोण कोण? 

भाजप : पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक काँग्रेस : इम्रान प्रतापगढीराष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेलशिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस