शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

राज्य बँक घेणार साखर परिषद : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:34 PM

इथेनॉलचे शाश्वत उत्पादन, कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर आणि खर्चावर नियंत्रण, इथेनॉल धोरण, सहवीज निर्मिती आणि वीज निर्मितीच्या धोरणावर शनिवारी चर्चा होईल..

ठळक मुद्देउद्योगांच्या अडचणींवर होणार मंथन चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सहभागी होणार

पुणे : कर्जदाराचे कर्ज बुडीत झाल्यानंतर बँका संबंधिताची मालमत्ता जप्त करुन उद्योगच बंद करते. मात्र, कारखान्यांची खाती अनुत्पादक (एनपीए) होऊ नये यासाठी बँकांनी देखील आपली भूमिका पार पाडली पाहीजे, या हेतूने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पुण्यात साखर परिषद बोलावली आहे. येत्या शनिवारी (दि. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. रविवारी (दि. ७) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोप होईल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे आणि व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख या वेळी उपस्थित होते. परिषदेच्या पूर्व संध्येला (दि. ५) आयोजित सहकार प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सहकार मंत्री सुभाष देशमुख, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार आयुक्त सतीश सोनी या वेळी उपस्थित राहतील.इथेनॉलचे शाश्वत उत्पादन, कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर आणि खर्चावर नियंत्रण, इथेनॉल धोरण, सहवीज निर्मिती आणि वीज निर्मितीच्या धोरणावर शनिवारी चर्चा होईल. कानपूरच्या राष्ट्रीय ऊस संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार, मिटकॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील नातू यात सहभागी होतील. रविवारच्या चर्चासत्रात ऊस लागवड, उसावरील रोग व कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, साखरेचा दर्जा आणि वितरण व्यवस्थेवर चर्चा होईल. त्यात कृषी भूषण संजीव माने, जैन इरिगेशनचे अभय जैन, ब्रिटानियाचे उपाध्यक्ष मनोज बालगी यात सहभागी होतील. दुपारी ३ वाजता होणाऱ्या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सहभागी होणार आहेत.  कर्ज, त्याची परतफेड अथवा मालमत्ता विकून त्याची वसुली अशी बँकाची भूमिका मर्यादित नाही. बँकेचा पैसा संबंधित उद्योगात गुंतला असल्याने ती देखील एकप्रकारे त्या व्यवसायाची भागीदारच असते. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी मालमत्ता विकून संबंधित व्यवसाय बंद करण्याची भूमिका नसावी. उलट संबंधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी काय करता येईल, याचा देखील विचार बँकांनी केला पाहीजे, त्यासाठी साखर परिषद आयोजित करण्यात आल्याचे अनास्कर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारbusinessव्यवसाय