शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो! राजू शेट्टींचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 18:02 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो, अशी साद घातली आहे. तसेच भाजमधील पक्षांतरावरही टीका केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा देत भाजपाच्या वाटेवर असल्याने राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. तसेच स्वाभिमानीच्या शिलेदारांनी ज्वलंत प्रश्न घेऊन मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो, अशी साद घातली आहे. तसेच भाजमधील पक्षांतरावरही टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्थैर्य निर्माण झालेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बहुतेक सर्वच राजकीय नेते व कार्यकर्ते सत्तेच्या दिशेने पळत सुटताना दिसत आहेत. जे येत नाहीत त्यांच्या मागे चौकशीची ईडापिडा लावली जाते. आर्थिक कोंडी केली जाते आणि त्यानांही नाईलाजाने भरती व्हावे लागते. अशा पध्दतीने महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक राहतोय काय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.देशातील राजकीय वाटचाल एकपक्षीय राजवटीच्या दिशेने निघालेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर विरोधी पक्षाची गरज सांगताना त्यांनी सत्ता कोणाचीही असो विरोधी पक्ष हा सर्वसामान्यांचा आधार असतो. तो आधारच काढून घ्यायचे राज्यकर्त्यांनी ठरविलेले दिसते. अशा परिस्थितीमध्ये स्वाभिमानीच्या शिलेदारांनी सर्वसामान्यांचे ज्वलंत प्रश्न घेऊन मैदानात ऊतरून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. चळवळ करणे हे इतके सोपे राहिले नाही हे तुम्हाला चार वर्षांत लक्षात आलेले आहेच. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाव्या लागतील, खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल कालपर्यंत बरोबर असणारा माणूस फोडून घेतील आपल्या विरोधात एवढेच ते करू शकतात. आपण थोडेच ईडी, इन्कमटॅक्स, सी.बी.आयला घाबरणारे आहोत? एकमेकांबद्दल गैरसमज पसरविणे, द्वेष निर्माण करणे यामध्ये त्यांची खासियत आहे. अशा या वादळात खवळलेल्या तुफान समुद्रात स्वाभिमानीचा दिवा घेऊन मी आपलं गलबत समुद्रात सोडलेले आहे. दिवा विझू न देता जहाज किनाऱ्यावर न्यायचं आहे. मोठमोठ्या लाटा येत आहेत किनारा येणार आहे कि नाही मला माहित नाही. मी या जहाजाचा कॅप्टन आहे. किनारा गाठण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. याचबरोबर जहाज बुडायला लागले तर ज्यांना लाईफ जॅकेट मिळाले त्यांनी त्याचा अवश्य स्वीकार करावा, असे सांगत दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच एकत्र काम केल्यानंतर एकमेकांना शिव्याशापही देत बसू नका असे सांगितले. माझे किंवा माझ्या सहकाऱ्यांचे काही निर्णय कदाचित चुकले असतील पण त्यामागे व्यक्तीगत स्वार्थ निश्चितच नव्हता व असणारही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीRavikant Tupkarरविकांत तुपकरBJPभाजपा