शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:20 IST

Raju Shetti News: शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, नाहीतर फणा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली.

Raju Shetti News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अनेक जिल्ह्यातून या शक्तिपीठ महामार्गाचा विरोध वाढताना पाहायला मिळत आहे. यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक होत सरकारला इशारा दिला आहे. 

शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, नाहीतर फणा काढल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी शक्तिपीठ महामार्गामुळे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. सरकारला याबाबत गुडघे टेकण्यास भाग पाडू, असा इशारा देण्यात आला. शक्तिपीठ महामार्गाविरोधात भरपावसात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ०६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती करावी. राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारी शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची व शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी पांडुरंगाने द्यावी, या मागणीसाठी ०४ जुलैला पंढरपूर येथे साकडे घालणार आहे, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

सरकार कर्जमुक्तीस टाळाटाळ करत आहे

महायुतीच्या वतीने निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. आता सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस कर्जमुक्तीस टाळाटाळ करत आहे. एकीकडे कर्जमुक्ती करण्यास पैसे नसताना, कुणाचा तरी व्यवसाय वृद्धींगत व्हावा, कुणाच्या तरी कंपन्यांची भरभराट व्हावी, याकरिता राज्यातील शेतकरी व सामान्य जनतेवर शक्तिपीठ महामार्गाचा वरवंटा फिरवत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.

दरम्यान, राज्यातील १२ जिल्ह्यात शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्यावतीने सविनय कायदेभंग करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व सामान्य जनतेच्यावतीने पंचगंगा पुलावर जवळपास दोन तास राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको करून शक्तीपीठ व सरकारच्या विरोधातील जनभावना दाखविण्यात आले. 

 

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गRaju Shettyराजू शेट्टी