शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:20 IST

Raju Shetti News: शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, नाहीतर फणा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली.

Raju Shetti News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अनेक जिल्ह्यातून या शक्तिपीठ महामार्गाचा विरोध वाढताना पाहायला मिळत आहे. यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक होत सरकारला इशारा दिला आहे. 

शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, नाहीतर फणा काढल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी शक्तिपीठ महामार्गामुळे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. सरकारला याबाबत गुडघे टेकण्यास भाग पाडू, असा इशारा देण्यात आला. शक्तिपीठ महामार्गाविरोधात भरपावसात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ०६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती करावी. राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारी शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची व शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी पांडुरंगाने द्यावी, या मागणीसाठी ०४ जुलैला पंढरपूर येथे साकडे घालणार आहे, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

सरकार कर्जमुक्तीस टाळाटाळ करत आहे

महायुतीच्या वतीने निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. आता सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस कर्जमुक्तीस टाळाटाळ करत आहे. एकीकडे कर्जमुक्ती करण्यास पैसे नसताना, कुणाचा तरी व्यवसाय वृद्धींगत व्हावा, कुणाच्या तरी कंपन्यांची भरभराट व्हावी, याकरिता राज्यातील शेतकरी व सामान्य जनतेवर शक्तिपीठ महामार्गाचा वरवंटा फिरवत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.

दरम्यान, राज्यातील १२ जिल्ह्यात शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्यावतीने सविनय कायदेभंग करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व सामान्य जनतेच्यावतीने पंचगंगा पुलावर जवळपास दोन तास राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको करून शक्तीपीठ व सरकारच्या विरोधातील जनभावना दाखविण्यात आले. 

 

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गRaju Shettyराजू शेट्टी