शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Raju Shetti: “राज्य चालवताय का हजामत करताय?”; राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 23:57 IST

Raju Shetti: शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळावी, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

सांगली:शेतकरी प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवरून राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णयही राजू शेट्टी यांनी घेतला आहे. यातच आता राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत, राज्य चालवताय का हजामत करताय, असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

सांगलीच्या भिलवडी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळावी, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्याबाबत १ मे रोजी गावागावात होणाऱ्या ग्रामसभेत शेतकर्‍यांना २४ तास वीज मिळण्याबाबतचा ठरावही घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

राज्य सरकारच्या विरोधात उतरण्याची तयारी

राज्य सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनात उतरण्याची तयारी राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना केवळ दिवसा वा रात्री नाही, तर २४ तास वीज मिळावी, या मागणीसाठी आपण आग्रही असल्याचे राजू शेट्टी नमूद केले. राज्यात दुधाचे एक रकमी पैसे मिळतात,कापसाचे पैसे एक रकमी मिळतात, मग उसाचे पैसे एकरकमी का मिळत नाहीत? म्हणून आम्ही एकरकमी एफआरपीवर ठाम आहोत, असे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. 

मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक

राज्यात उन्हाळी सोयाबीन पिकाच्या बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा समोर आले आहे. हे राज्य सरकार आणि कृषी विभागाचे अपयश आहे. शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाणे देण्यात आले. महाबीजवर नियंत्रण हे कृषी मंत्रालयाचे असते आणि कृषी मंत्रालय हे राज्य सरकार चालवते. सोयाबीन बियाणांमध्ये फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी राज्यातून पुढे येत आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक झालेली आहे. एका बाजूला ही फसवणूक आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. रात्रीच्या वेळेस साप चावून अनेक शेतकरी मृत पावलेले आहेत. त्यामुळे चेष्टा चालवली आहे का? तुम्ही राज्य चालवता की, हजामत करता? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे. एका बाजूला सर्वसामान्यांना २४ तास वीज,मात्र शेतकऱ्यांना रात्री, हा अन्याय आहे. राज्यातून ज्या धरणातून वीज निर्मिती केली जाते, त्या धरणातील जमिनी या शेतकऱ्यांचे आहेत. मात्र त्याच शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. संविधानानुसार, ऊर्जा संपत्तीवर सर्वांचा सामना हक्क आहे. पण इतरांना दिवसा वीज व शेतकऱ्यांना रात्रीचे वीज हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFarmerशेतकरीPoliticsराजकारण