शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

Raju Shetti: “राज्य चालवताय का हजामत करताय?”; राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 23:57 IST

Raju Shetti: शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळावी, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

सांगली:शेतकरी प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवरून राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णयही राजू शेट्टी यांनी घेतला आहे. यातच आता राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत, राज्य चालवताय का हजामत करताय, असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

सांगलीच्या भिलवडी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळावी, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्याबाबत १ मे रोजी गावागावात होणाऱ्या ग्रामसभेत शेतकर्‍यांना २४ तास वीज मिळण्याबाबतचा ठरावही घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

राज्य सरकारच्या विरोधात उतरण्याची तयारी

राज्य सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनात उतरण्याची तयारी राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना केवळ दिवसा वा रात्री नाही, तर २४ तास वीज मिळावी, या मागणीसाठी आपण आग्रही असल्याचे राजू शेट्टी नमूद केले. राज्यात दुधाचे एक रकमी पैसे मिळतात,कापसाचे पैसे एक रकमी मिळतात, मग उसाचे पैसे एकरकमी का मिळत नाहीत? म्हणून आम्ही एकरकमी एफआरपीवर ठाम आहोत, असे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. 

मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक

राज्यात उन्हाळी सोयाबीन पिकाच्या बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा समोर आले आहे. हे राज्य सरकार आणि कृषी विभागाचे अपयश आहे. शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाणे देण्यात आले. महाबीजवर नियंत्रण हे कृषी मंत्रालयाचे असते आणि कृषी मंत्रालय हे राज्य सरकार चालवते. सोयाबीन बियाणांमध्ये फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी राज्यातून पुढे येत आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक झालेली आहे. एका बाजूला ही फसवणूक आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. रात्रीच्या वेळेस साप चावून अनेक शेतकरी मृत पावलेले आहेत. त्यामुळे चेष्टा चालवली आहे का? तुम्ही राज्य चालवता की, हजामत करता? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे. एका बाजूला सर्वसामान्यांना २४ तास वीज,मात्र शेतकऱ्यांना रात्री, हा अन्याय आहे. राज्यातून ज्या धरणातून वीज निर्मिती केली जाते, त्या धरणातील जमिनी या शेतकऱ्यांचे आहेत. मात्र त्याच शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. संविधानानुसार, ऊर्जा संपत्तीवर सर्वांचा सामना हक्क आहे. पण इतरांना दिवसा वीज व शेतकऱ्यांना रात्रीचे वीज हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFarmerशेतकरीPoliticsराजकारण