शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 11:28 IST

काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देसरकारी कर्मचारी आलेल्या आदेशाला दुसऱ्यांदा नकार देऊ शकत नाही. ज्या ‘राजकीय मालकां’नी हवी तशी कारवाई करण्यास भाग पाडले त्यांची नावे-पत्ते घ्यावेत.

मुंबई : भारतात पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमान असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप निराधार आहे. घुसखोरीबाबत बेछूट आरोप करण्याऐवजी त्यांनी देशात किती घुसखोर आहेत त्याचा आकडा द्यावा. घुसखोरीबाबतचे पुरावे द्यावेत. विनाकारण ढोल बडवत बसू नये, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केली. 

देशातील घुसखोरांविरोधात मनसेने ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. या मोर्चाबाबत आंबेडकर म्हणाले, राज ठाकरे यांच्या या बेछूट विधानांमुळे पोलीस आणि तपास यंत्रणांचे मनोबल खच्ची होते. ७० वर्षांपासून इथल्या प्रशासनाने सर्व आव्हाने पेलली. संकटे परतवून लावली. स्व प्रसिद्धीसाठी, राजकारणासाठी घुसखोरीचे आरोप केल्याने यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहोत. हेर खात्यातील लोक आपला जीव धोक्यात ठेवून काम करीत असतात. अशात देशात लाखो घुसखोर मुसलमान स्थायिक असल्याचे विधान जेव्हा केले जाते तेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीवरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. राज यांनी आधी आकडे द्यावेत, पुरावे मांडावेत, असे आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिले. काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचे प्रकार घडले आहेत. हिंमत असल्यास काँग्रेसने आमच्या काळात टॅपिंग झाले नसल्याचा दावा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. 

‘कोरेगाव भीमा प्रकरणी अभय द्या’कोरेगाव भीमा प्रकरणी सरकारी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने अभय द्यावे. तत्कालीन सरकारच्या इशाऱ्यावर तपास झाला होता. सरकारी कर्मचारी आलेल्या आदेशाला दुसऱ्यांदा नकार देऊ शकत नाही. तसे केल्यास त्याची नोकरी जाते. त्यामुळे सध्याच्या सरकारने अधिकारी, कर्मचाºयांना आधी अभय द्यावे. त्या बदल्यात ज्या ‘राजकीय मालकां’नी हवी तशी कारवाई करण्यास भाग पाडले त्यांची नावे-पत्ते घ्यावेत. या राजकीय मालकांवर कारवाई करावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

कोरेगाव भीमा प्रकरणी जाणीवपूर्वक डाव्या कार्यकर्त्यांना गोवण्यात आल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. त्याची कागदपत्रेही आपल्याकडे पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी ही कागदपत्रे जाहीर करावीत, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरेंच्या भाषणातील 40 पैकी 20 मिनिटे हिंदूत्वावरच

मी मराठीच, माझा डीएनए भगवा! घुसखोरांविरुद्ध राज ठाकरे यांचा एल्गार

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMNSमनसेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMumbaiमुंबईcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकcongressकाँग्रेस