शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 11:28 IST

काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देसरकारी कर्मचारी आलेल्या आदेशाला दुसऱ्यांदा नकार देऊ शकत नाही. ज्या ‘राजकीय मालकां’नी हवी तशी कारवाई करण्यास भाग पाडले त्यांची नावे-पत्ते घ्यावेत.

मुंबई : भारतात पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमान असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप निराधार आहे. घुसखोरीबाबत बेछूट आरोप करण्याऐवजी त्यांनी देशात किती घुसखोर आहेत त्याचा आकडा द्यावा. घुसखोरीबाबतचे पुरावे द्यावेत. विनाकारण ढोल बडवत बसू नये, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केली. 

देशातील घुसखोरांविरोधात मनसेने ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. या मोर्चाबाबत आंबेडकर म्हणाले, राज ठाकरे यांच्या या बेछूट विधानांमुळे पोलीस आणि तपास यंत्रणांचे मनोबल खच्ची होते. ७० वर्षांपासून इथल्या प्रशासनाने सर्व आव्हाने पेलली. संकटे परतवून लावली. स्व प्रसिद्धीसाठी, राजकारणासाठी घुसखोरीचे आरोप केल्याने यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहोत. हेर खात्यातील लोक आपला जीव धोक्यात ठेवून काम करीत असतात. अशात देशात लाखो घुसखोर मुसलमान स्थायिक असल्याचे विधान जेव्हा केले जाते तेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीवरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. राज यांनी आधी आकडे द्यावेत, पुरावे मांडावेत, असे आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिले. काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचे प्रकार घडले आहेत. हिंमत असल्यास काँग्रेसने आमच्या काळात टॅपिंग झाले नसल्याचा दावा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. 

‘कोरेगाव भीमा प्रकरणी अभय द्या’कोरेगाव भीमा प्रकरणी सरकारी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने अभय द्यावे. तत्कालीन सरकारच्या इशाऱ्यावर तपास झाला होता. सरकारी कर्मचारी आलेल्या आदेशाला दुसऱ्यांदा नकार देऊ शकत नाही. तसे केल्यास त्याची नोकरी जाते. त्यामुळे सध्याच्या सरकारने अधिकारी, कर्मचाºयांना आधी अभय द्यावे. त्या बदल्यात ज्या ‘राजकीय मालकां’नी हवी तशी कारवाई करण्यास भाग पाडले त्यांची नावे-पत्ते घ्यावेत. या राजकीय मालकांवर कारवाई करावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

कोरेगाव भीमा प्रकरणी जाणीवपूर्वक डाव्या कार्यकर्त्यांना गोवण्यात आल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. त्याची कागदपत्रेही आपल्याकडे पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी ही कागदपत्रे जाहीर करावीत, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरेंच्या भाषणातील 40 पैकी 20 मिनिटे हिंदूत्वावरच

मी मराठीच, माझा डीएनए भगवा! घुसखोरांविरुद्ध राज ठाकरे यांचा एल्गार

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMNSमनसेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMumbaiमुंबईcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकcongressकाँग्रेस