शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 09:28 IST

उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक कारणे असतील. बाळासाहेबांनी खुर्चीला कधी महत्त्व दिले नाही. परंतु आता जे काही झाले ते खुर्चीसाठी होतंय अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 

मुंबई - Smita Thackeray Interview ( Marathi News ) कुटुंबात दुफळी नको व्हायला हवी होती. आजही बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख होत असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगळे होऊ नयेत यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण काही गोष्टी खोलवर रुजलेल्या असतात. त्या सहसा निघत नाही. काहींचा असा उद्देश असतो की आम्हीच वारसदार आहोत. अशी वृत्ती कुणा एकाच्या मनात असेल तर कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसतात. या वृत्तीने कोण वागत असेल तर एकजूट कशी राहील? असं मत बाळासाहेब ठाकरेंच्या सून स्मिता ठाकरे यांनी केले आहे. 

स्मिता ठाकरे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे राजकारणात नव्हते, सर्वात आधी राज ठाकरेच राजकारणात आले होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांची काम करण्याची पद्धत, निर्णय घेण्याचं कौशल्य हे सर्व आत्मसात केले होते. राज ठाकरे राजकारणात पहिले आले. उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते. परंतु एक दिवस अचानक उद्धव ठाकरेंना वाटलं आपणही राजकारणात आले पाहिजे. कोणत्या उद्देशाने ते राजकारणात आले हे मला माहिती नाही. राजकारण हे समाजकारण असतं त्यामुळे ते चांगलेच होते. ते दोघे राजकारणात होते, मी नव्हते. उद्धव ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीमुळे काही गोष्टी विस्कळीत झाल्या. कोणाला कमी तर कोणाला जास्त मिळाले हे होत गेले असा खुलासा त्यांनी केला. ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

तसेच  माँसाहेब गेल्यानंतर बाळासाहेबांसाठी तो कठीण काळ होता. त्या काळात मी आणि माझी मुले त्यांच्यासोबत होतो. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये काय होते, ते कधीही कुणी बोलले नाही. मी सून आहे. या गोष्टी अंतर्गत होत्या. त्या कधीही पुढे आल्या नाहीत. यावर मी बोलणार नाही. कारण हे डर्टी पॉलिटिक्स आहे. माझ्यासाठी बाळासाहेब गुरु होते. आज मी जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे. मी सतत लोकांच्या संपर्कात असायची. मी बाळासाहेबांकडे बघून शिकत होती. प्रत्येकाला साहेब भेटू शकत नव्हते तेव्हा साहेबांनी मला त्यांच्याशी बोलायला सांगायचे. हळूहळू ते वाढत गेले. आम्हाला जे सांगितले ते करत होतो. आपल्याला संधी मिळाली आहे त्यातून लोकांच्या समस्या सोडवल्या जात असतील तर ते करण्यास काहीच हरकत नव्हती. त्याच उद्देशाने मी २५ वर्ष समाजसेवा करत राहिली असं स्मिता ठाकरेंनी म्हटलं. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तेव्हा ते पाहून खूप वाईट वाटले. मी बाळासाहेबांसोबत बराच वेळ घालवला आहे. त्यांच्यासाठी सनातन जो आपला धर्म आहे तो खूप महत्त्वाचा असायचा. बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेने राजकारण केले. त्या विचारधारेपासून कुणी वेगळ्या मार्गाने जात असेल तर नक्कीच वाईट आहे. जर तुम्ही बाळासाहेबांना मानता, तर त्यांच्या विचारधारेने पुढे जायला हवे होते. महाविकास आघाडी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेपासून वेगळी होती. उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक कारणे असतील. बाळासाहेबांनी खुर्चीला कधी महत्त्व दिले नाही. परंतु आता जे काही झाले ते खुर्चीसाठी होतंय अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे