शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 09:28 IST

उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक कारणे असतील. बाळासाहेबांनी खुर्चीला कधी महत्त्व दिले नाही. परंतु आता जे काही झाले ते खुर्चीसाठी होतंय अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 

मुंबई - Smita Thackeray Interview ( Marathi News ) कुटुंबात दुफळी नको व्हायला हवी होती. आजही बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख होत असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगळे होऊ नयेत यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण काही गोष्टी खोलवर रुजलेल्या असतात. त्या सहसा निघत नाही. काहींचा असा उद्देश असतो की आम्हीच वारसदार आहोत. अशी वृत्ती कुणा एकाच्या मनात असेल तर कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसतात. या वृत्तीने कोण वागत असेल तर एकजूट कशी राहील? असं मत बाळासाहेब ठाकरेंच्या सून स्मिता ठाकरे यांनी केले आहे. 

स्मिता ठाकरे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे राजकारणात नव्हते, सर्वात आधी राज ठाकरेच राजकारणात आले होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांची काम करण्याची पद्धत, निर्णय घेण्याचं कौशल्य हे सर्व आत्मसात केले होते. राज ठाकरे राजकारणात पहिले आले. उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते. परंतु एक दिवस अचानक उद्धव ठाकरेंना वाटलं आपणही राजकारणात आले पाहिजे. कोणत्या उद्देशाने ते राजकारणात आले हे मला माहिती नाही. राजकारण हे समाजकारण असतं त्यामुळे ते चांगलेच होते. ते दोघे राजकारणात होते, मी नव्हते. उद्धव ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीमुळे काही गोष्टी विस्कळीत झाल्या. कोणाला कमी तर कोणाला जास्त मिळाले हे होत गेले असा खुलासा त्यांनी केला. ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

तसेच  माँसाहेब गेल्यानंतर बाळासाहेबांसाठी तो कठीण काळ होता. त्या काळात मी आणि माझी मुले त्यांच्यासोबत होतो. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये काय होते, ते कधीही कुणी बोलले नाही. मी सून आहे. या गोष्टी अंतर्गत होत्या. त्या कधीही पुढे आल्या नाहीत. यावर मी बोलणार नाही. कारण हे डर्टी पॉलिटिक्स आहे. माझ्यासाठी बाळासाहेब गुरु होते. आज मी जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे. मी सतत लोकांच्या संपर्कात असायची. मी बाळासाहेबांकडे बघून शिकत होती. प्रत्येकाला साहेब भेटू शकत नव्हते तेव्हा साहेबांनी मला त्यांच्याशी बोलायला सांगायचे. हळूहळू ते वाढत गेले. आम्हाला जे सांगितले ते करत होतो. आपल्याला संधी मिळाली आहे त्यातून लोकांच्या समस्या सोडवल्या जात असतील तर ते करण्यास काहीच हरकत नव्हती. त्याच उद्देशाने मी २५ वर्ष समाजसेवा करत राहिली असं स्मिता ठाकरेंनी म्हटलं. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तेव्हा ते पाहून खूप वाईट वाटले. मी बाळासाहेबांसोबत बराच वेळ घालवला आहे. त्यांच्यासाठी सनातन जो आपला धर्म आहे तो खूप महत्त्वाचा असायचा. बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेने राजकारण केले. त्या विचारधारेपासून कुणी वेगळ्या मार्गाने जात असेल तर नक्कीच वाईट आहे. जर तुम्ही बाळासाहेबांना मानता, तर त्यांच्या विचारधारेने पुढे जायला हवे होते. महाविकास आघाडी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेपासून वेगळी होती. उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक कारणे असतील. बाळासाहेबांनी खुर्चीला कधी महत्त्व दिले नाही. परंतु आता जे काही झाले ते खुर्चीसाठी होतंय अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे