शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स, कोविडही सोडला नाही; राज ठाकरेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:20 IST

आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही असं राज ठाकरे म्हणाले.

पनवेल – २०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग लोकांसाठी खुला होईल असं सांगतायेत. आनंद आहे. परंतु आत्ताच्या गणपतीचे काय? गेल्या १० वर्षात या महामार्गावर अडीच हजार माणसे दगावली. अपघातात कुटुंब गेली. टायर फुटतायेत. एकमेव कारण म्हणजे या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कसेही वागलो, काहीही केले तरी हे लोक आम्हाला मतदान करणार आहे अशी मानसिकता त्यांची झालीय अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील लोकप्रतिनिधींवर घणाघात केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, रस्ते खराब व्हायचे बंदच होणार नाहीत. हा एखादा रस्ता २५-३० वर्षासाठी चांगला केला तर पैसे खाणार कसे? हा धंदा आहे. रस्ते खराब झाले तर नवीन टेंडर, नवीन पैसे, नवीन टक्के हे सगळे सुरू आहे. एकमेकांवर ओरडतायेत. जे खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविडपण सोडला नाही. निवडणूक आल्यावर बाळासाहेबांचे नाव पुढे करायचे. अनेकदा मी पुण्यात मी भाषण केले. मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला पण पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही मी म्हटलं होते. नगररचना नावाची गोष्ट नाही. पुण्यात आज गुदमरलेला मराठी माणूस आहे. कोण यंतेय, कुठे राहतंय त्याचा पत्ता नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पनवेल येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. 

तसेच आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही. राज्याकडून होत नसेल तर केंद्राने दखल घ्यावी असं मी नितीन गडकरींना सांगितले. पण ते म्हणाले मी लक्ष घातले पण ते कंत्राटदार पळून गेलेत. भाषणापुरता मर्यादित राहू नये. नाणारचा प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू पुढे आले. ५ हजार एकर जमीन कोणी विकत घेतली? चिरीमिरीसाठी कोकणी माणसं जमीन विकतायेत. कुंपणच शेत खातंय. आपल्याच लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात जमीन घालतायेत असा आरोपही राज यांनी केला.

...तर मला देशद्रोही ठरवतात

२०२३ मध्ये गोव्यात कायदा केलाय, गोव्यातील शेतजमीन ती सहज कोणाला मिळणार नाही. शेतजमीन घ्यायची असेल तर तिथे शेतीच करावी लागेल. दुसरा धंदा करता येणार नाही असा कायदा आहे. तिथे भाजपाचे सरकार आहे. भाजपाचे मुख्यमंत्री असा कायदा करतायेत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणातात, आम्ही गोव्याचे गुडगाव किंवा छत्तीसपूर होऊ देणार नाही. उत्तरेकडून येणाऱ्या लोकांना आम्ही गोव्यात जमीन देणार नाही असं ते सांगतात. परंतु इथे राज ठाकरे काय बोलला तर तो देशद्रोही होतो असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

पुन्हा परप्रांतीय टार्गेट

कलम ३७० काढला, आधी जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेता येत नव्हती आता घेता येऊ शकते. जाऊन घ्या, तिथे मुकेश अंबानी, अदांनींना जमीन घेता येत नाही, आपलं सोडा. मिझोराम, हिमाचल प्रदेश तिथे जमीन घेता येत नाही. काही राज्यांना वेगळे कायदे असतात. महाराष्ट्रात सगळीकडून लोकं येतायेत आणि सगळ्या शहराची विल्हेवाट लागते. रस्ते बांधल्यानंतर जे पुढचे धोके आहेत त्याचा विचार करणार नाही का? शिवडी नाव्हाशेवा रस्ता सुरू झाला की रायगड जिल्ह्याचे काय होईल बघा, इतक्या बाहेरच्या लोकांनी तिथे जमीन घेतल्या आहेत. मूळ जमीन ज्याची त्याने विकली आणि तोच ज्याने जमीन घेतली त्याच्याकडे नोकरी करतोय असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीय मुद्दा अधोरेखित केला.

शिवसेनेचे आमदार-खासदार काय करतायेत?

महाराष्ट्रात अनेक पिढ्यानपिढ्या राहणारी लोकं आहेत. आपल्या पक्षात आहे. माझ्यादृष्टीने ते मराठीच आहेत. आपल्या कोकणातील मंडणगडचा तालुकाध्यक्ष सरदार आहे. त्याच्याशी बोलताना कधीही तो मराठी नाही हे समजणार नाही. त्याचे कुटुंब मराठी बोलते. १६-१७ वर्षे रस्ते बांधायला लागतात. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होते. मग कोकणातील आमदार-खासदार काय करतायेत? कोण रेटा लावतंय? शिवसेनचे अनेक आमदार, खासदार निवडून दिले काय करतायेत ते? दरडी कोसळतायेत, रस्ते अपघात होतायेत, माणसे मरतायेत काय करतायेत? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे