शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
3
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
4
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
5
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
6
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
7
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
8
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
9
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
10
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
11
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
12
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
13
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
14
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
15
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
16
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
17
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
18
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
19
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
20
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
Daily Top 2Weekly Top 5

जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स, कोविडही सोडला नाही; राज ठाकरेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:20 IST

आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही असं राज ठाकरे म्हणाले.

पनवेल – २०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग लोकांसाठी खुला होईल असं सांगतायेत. आनंद आहे. परंतु आत्ताच्या गणपतीचे काय? गेल्या १० वर्षात या महामार्गावर अडीच हजार माणसे दगावली. अपघातात कुटुंब गेली. टायर फुटतायेत. एकमेव कारण म्हणजे या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कसेही वागलो, काहीही केले तरी हे लोक आम्हाला मतदान करणार आहे अशी मानसिकता त्यांची झालीय अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील लोकप्रतिनिधींवर घणाघात केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, रस्ते खराब व्हायचे बंदच होणार नाहीत. हा एखादा रस्ता २५-३० वर्षासाठी चांगला केला तर पैसे खाणार कसे? हा धंदा आहे. रस्ते खराब झाले तर नवीन टेंडर, नवीन पैसे, नवीन टक्के हे सगळे सुरू आहे. एकमेकांवर ओरडतायेत. जे खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविडपण सोडला नाही. निवडणूक आल्यावर बाळासाहेबांचे नाव पुढे करायचे. अनेकदा मी पुण्यात मी भाषण केले. मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला पण पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही मी म्हटलं होते. नगररचना नावाची गोष्ट नाही. पुण्यात आज गुदमरलेला मराठी माणूस आहे. कोण यंतेय, कुठे राहतंय त्याचा पत्ता नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पनवेल येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. 

तसेच आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही. राज्याकडून होत नसेल तर केंद्राने दखल घ्यावी असं मी नितीन गडकरींना सांगितले. पण ते म्हणाले मी लक्ष घातले पण ते कंत्राटदार पळून गेलेत. भाषणापुरता मर्यादित राहू नये. नाणारचा प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू पुढे आले. ५ हजार एकर जमीन कोणी विकत घेतली? चिरीमिरीसाठी कोकणी माणसं जमीन विकतायेत. कुंपणच शेत खातंय. आपल्याच लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात जमीन घालतायेत असा आरोपही राज यांनी केला.

...तर मला देशद्रोही ठरवतात

२०२३ मध्ये गोव्यात कायदा केलाय, गोव्यातील शेतजमीन ती सहज कोणाला मिळणार नाही. शेतजमीन घ्यायची असेल तर तिथे शेतीच करावी लागेल. दुसरा धंदा करता येणार नाही असा कायदा आहे. तिथे भाजपाचे सरकार आहे. भाजपाचे मुख्यमंत्री असा कायदा करतायेत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणातात, आम्ही गोव्याचे गुडगाव किंवा छत्तीसपूर होऊ देणार नाही. उत्तरेकडून येणाऱ्या लोकांना आम्ही गोव्यात जमीन देणार नाही असं ते सांगतात. परंतु इथे राज ठाकरे काय बोलला तर तो देशद्रोही होतो असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

पुन्हा परप्रांतीय टार्गेट

कलम ३७० काढला, आधी जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेता येत नव्हती आता घेता येऊ शकते. जाऊन घ्या, तिथे मुकेश अंबानी, अदांनींना जमीन घेता येत नाही, आपलं सोडा. मिझोराम, हिमाचल प्रदेश तिथे जमीन घेता येत नाही. काही राज्यांना वेगळे कायदे असतात. महाराष्ट्रात सगळीकडून लोकं येतायेत आणि सगळ्या शहराची विल्हेवाट लागते. रस्ते बांधल्यानंतर जे पुढचे धोके आहेत त्याचा विचार करणार नाही का? शिवडी नाव्हाशेवा रस्ता सुरू झाला की रायगड जिल्ह्याचे काय होईल बघा, इतक्या बाहेरच्या लोकांनी तिथे जमीन घेतल्या आहेत. मूळ जमीन ज्याची त्याने विकली आणि तोच ज्याने जमीन घेतली त्याच्याकडे नोकरी करतोय असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीय मुद्दा अधोरेखित केला.

शिवसेनेचे आमदार-खासदार काय करतायेत?

महाराष्ट्रात अनेक पिढ्यानपिढ्या राहणारी लोकं आहेत. आपल्या पक्षात आहे. माझ्यादृष्टीने ते मराठीच आहेत. आपल्या कोकणातील मंडणगडचा तालुकाध्यक्ष सरदार आहे. त्याच्याशी बोलताना कधीही तो मराठी नाही हे समजणार नाही. त्याचे कुटुंब मराठी बोलते. १६-१७ वर्षे रस्ते बांधायला लागतात. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होते. मग कोकणातील आमदार-खासदार काय करतायेत? कोण रेटा लावतंय? शिवसेनचे अनेक आमदार, खासदार निवडून दिले काय करतायेत ते? दरडी कोसळतायेत, रस्ते अपघात होतायेत, माणसे मरतायेत काय करतायेत? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे