शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

Raj Thackeray: औरंगाबाद की संभाजीनगर?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 3:14 PM

गेल्या काही वर्षापासून शिवसेना औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी करत आहे

ठळक मुद्देऔरंगाबादचं नामकरण करण्याचा ठोस निर्णय घेतला गेला नाहीएसटी बसेसवर मनसे कार्यकर्त्यांनी संभाजीनगर नावाचे पोस्टर्स लावलेऔरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत?

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल करत असताना शिवसेनेचे मुद्दे हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. यातच मराठवाडा दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असल्यामुळे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी संभाजीनगर असा उल्लेख असणारे बॅनर्स लावले होते. 

गेल्या काही वर्षापासून शिवसेना औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी करत आहे. मात्र मागील सत्तेच्या ५ वर्षाच्या काळात असेल अथवा सध्या आत्ताच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत शिवसेना सहभागी आहे. मात्र औरंगाबादचं नामकरण करण्याचा ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनसेला शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी हा मुद्दा आयताच हातात सापडला आहे. आगामी येऊ लातलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेने संभाजीनगर नाव करावी ही मागणी केली आहे. याबाबत मनसेकडून मुंबईत कुर्ला एसटी डेपोमध्ये आंदोलन करण्यात आलं. मुंबई-औरंगाबाद एसटी बसेसवर मनसे कार्यकर्त्यांनी संभाजीनगर नावाचे पोस्टर्स लावले होते. 

...तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्ववादी?; राज ठाकरेंची शिवसेनेला चपराक

'लाव रे तो व्हिडीओ'मधून पुलवामा हल्ल्यावर शंका घेणारे राज ठाकरे आता म्हणतात...

राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं सांगत शिवसेनेला टोला लगावला. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यासाठी मनसे आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचंही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. 

राज ठाकरे मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार; उद्या मुंबईत परतणार

दरम्यान, मनसेला शिवसेनेचं उष्ट खाण्याची सवयच लागली आहे असं सांगत शिवसेना मंत्री गुलाबराव  पाटील यांनी मनसेवर निशाणा साधला होता. तर मनसेचे अविनाश जाधव यांनीही त्याला प्रत्युत्तर देत मागच्या ५ वर्षात शिवसेना सत्तेत होती, आताही सत्तेत आहे पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हिंमत झाली नाही आणि आम्ही त्याचा उच्चार केला तर त्याची एवढी धास्ती घेतली असा टोला शिवसेनेला लगावला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी सज्ज झाली असल्याचं दिसून येत आहे. 

हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...  

शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील पत्रकारांशी गप्पा मारताना विविध मुद्द्यावर भाष्य केलं. हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला म्हणजे विकासाकडे आता दुर्लक्ष केलं असं होत नाही. शहरांचा विकास करणं, ती शहरं घडवणं हा माझ्यासाठी राजकीय विषय नाही तर तो माझ्या पॅशनचा विषय आहे. जगातील अनेक शहरं मी जेंव्हा पाहतो तेंव्हा तिथल्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रातल्या शहरात असाव्यात असं मला वाटत राहतं म्हणून मी नाशिकमध्ये त्यातल्या अनेक गोष्टी घडवून दाखवल्या पण माझ्या एक लक्षात आलं की नाशिकमध्ये लोकं विकासाला मत देत नाहीत अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली. 

 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादHindutvaहिंदुत्व