शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:05 IST

Raj Thackeray PC News: वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यासाठी मनसेने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

Raj Thackeray PC News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवण्याचा मनसेचा मानस आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील विविध भागात दौरे करत आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी काही मतदारसंघांचा आढावा घेऊन उमेदवारही जाहीर केले. यावेळी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसे उमेदवार देणार का, याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

बदलापूरचे प्रकरण दुर्दैवी आहे. अशा लोकांना ठेचलच पाहिजे. शासन कठोर होत नाही. त्यामुळे हे प्रकार होतात. निर्भया प्रकरणातील नराधमांना किती वर्षांनी फाशी झाली, असा मुद्दा उपस्थित करत, मनोज जरांगे उपोषण करत आंदोलनाला बसले होते. तिथे लाठीचार्ज झाला. त्यानंतर पोलिसांवरच कारवाई झाली. लाठीचार्ज करावा, हे पोलिसांना सुचले का? कारवाई केल्यावर ते प्रकरण आपल्याच अंगलट येणार असेल, तर पोलीसही ठाम भूमिका घेऊ शकणार नाहीत, असेच दिसले. अशा वेळेस राज्य सरकारने पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. हाच धागा पकडत पत्रकारांनी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार का, असा प्रश्न विचारला. यावर बोलताना, मी निवडणूक लढवणार आहे. मागच्या वेळेस एकदा जी गोष्ट केली, त्या मतदारसंघात साधारणपणे आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. एकदा ही गोष्ट झाली. वारंवार कशी होईल, असे सांगत राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार देण्याबाबत स्पष्ट संकेत दिले.

दरम्यान, राज्यातील जनता एक दिवस हातात राज्य देईल. कारण १९५२ सालापासून भाजपा असेच आवाहन देशातील जनतेला करत आला आहे. तेव्हा जनसंघ होता. २०१४ मध्ये भाजपाला सत्ता मिळाली. वेळा लागतो, असा आशावाद राज ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. जातीचे विष पवारांनी कालवले. संतांची आडनावे राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली. महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच केली जाऊ लागली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना