शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:05 IST

Raj Thackeray PC News: वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यासाठी मनसेने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

Raj Thackeray PC News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवण्याचा मनसेचा मानस आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील विविध भागात दौरे करत आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी काही मतदारसंघांचा आढावा घेऊन उमेदवारही जाहीर केले. यावेळी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसे उमेदवार देणार का, याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

बदलापूरचे प्रकरण दुर्दैवी आहे. अशा लोकांना ठेचलच पाहिजे. शासन कठोर होत नाही. त्यामुळे हे प्रकार होतात. निर्भया प्रकरणातील नराधमांना किती वर्षांनी फाशी झाली, असा मुद्दा उपस्थित करत, मनोज जरांगे उपोषण करत आंदोलनाला बसले होते. तिथे लाठीचार्ज झाला. त्यानंतर पोलिसांवरच कारवाई झाली. लाठीचार्ज करावा, हे पोलिसांना सुचले का? कारवाई केल्यावर ते प्रकरण आपल्याच अंगलट येणार असेल, तर पोलीसही ठाम भूमिका घेऊ शकणार नाहीत, असेच दिसले. अशा वेळेस राज्य सरकारने पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. हाच धागा पकडत पत्रकारांनी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार का, असा प्रश्न विचारला. यावर बोलताना, मी निवडणूक लढवणार आहे. मागच्या वेळेस एकदा जी गोष्ट केली, त्या मतदारसंघात साधारणपणे आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. एकदा ही गोष्ट झाली. वारंवार कशी होईल, असे सांगत राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार देण्याबाबत स्पष्ट संकेत दिले.

दरम्यान, राज्यातील जनता एक दिवस हातात राज्य देईल. कारण १९५२ सालापासून भाजपा असेच आवाहन देशातील जनतेला करत आला आहे. तेव्हा जनसंघ होता. २०१४ मध्ये भाजपाला सत्ता मिळाली. वेळा लागतो, असा आशावाद राज ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. जातीचे विष पवारांनी कालवले. संतांची आडनावे राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली. महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच केली जाऊ लागली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना