शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज ठाकरे बोलले नाहीत, पण अविनाश जाधव बोलले; भाजपसोबत जाण्यावर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 18:41 IST

आज सकाळी राज ठाकरे-आशिष शेलार यांच्यात तासभर झाली चर्चा

Raj Thackeray Ashish Shelar Meeting, Ainash Jadhav: आता सुरू असलेलं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. तेव्हापासून कधीही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील असे बोलले जात आहे. असे असताना केंद्रीय आणि राज्य पातळीवर विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपाने सोबत घेतले. त्यानंतर आता मनसेलाही सोबत घेण्यास भाजपा उत्सुक असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आशिष शेलार हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटल्याचे सांगण्यात आले. पण शेलार किंवा ठाकरे दोघांनीही याबाबत अधिकृत भाष्य केले नाही. असे असले तरी मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी याविषयी भाष्य केले.

"लोकसभेच्या दृष्टीने आमचे जे कार्यक्रम सुरू आहेत ते 'एकला चलो रे' या नाऱ्याने सुरू आहे. लोकसभेच्या दृष्टीने आमच्या बैठका सुरू आहेत. जे काही आहे ते स्वबळाच्या तयारीने सुरू केले आहे. पण युतीच्या बाबतीत सर्व निर्णय राज ठाकरेंचा असतो. राज ठाकरे जो निर्णय घेतील, त्या मार्गाने आम्ही काम करू. लोकसभेच्या दृष्टीने ज्या सभा होतील, त्या संपूर्ण महाराष्ट्रभर होतील यात वाद नाही. शेलारांशी भेटीत काय घडले याबाबतीत मला फार कमी माहिती आहे. परंतु आशिष शेलार अनेकदा राज ठाकरे यांची भेट घ्यायला येतात. बंगल्याच्या आत काय चर्चा झाली? ते उद्या राज ठाकरेंसोबत बैठक झाल्यानंतरच आम्हाला कळेल. युती आघाडीचे जे काही निर्णय आहेत, ते राज ठाकरेच घेतील," असे अविनाश जाधव म्हणाले.

"मुख्यमंत्री यांना राज ठाकरे भेटतात आणि मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटण्याकरिता जातात. ही बाब जनहिताची आहे. शिक्षकांचा विषय आहे की, दहावी बारावी मधील मुलांच्या परीक्षेची वेळ आली आहे. शिक्षकांना काढून तुम्ही निवडणुकीच्या कामाला लावलं आहे. नववी, दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे वर्ष आहे. मुलांनी परीक्षा द्यायची कशी आणि त्यांना शिकवणार कोण? हा मोठा प्रश्न आहे. जनहिताच्या प्रश्नांसाठी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. उद्याची आमची महत्त्वाची बैठक आहे. लोकसभेच्या दृष्टीने आमच्या मागील दोन महिन्यांपासून बैठका सुरू आहेत," अशी माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधव