शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
2
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
3
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
4
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
5
जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे
6
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
7
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
8
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
9
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
10
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
11
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
12
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
13
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
14
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
15
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
16
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
17
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
18
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
19
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
20
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 01:33 IST

Raj Thackeray Pahalgam Attack: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल एक मोठं विधान केले. काश्मीरमध्ये काहीतरी मोठं होणार आणि पर्यटकांना मारतील, असे मला आधीच जाणवत होतो. मी हे वर्षभरापासून अनेकांशी बोलत होतो, असे विधान राज ठाकरेंनी केली. 

Raj Thackeray Latest News: 'तुम्हाला आज जे सांगतोय, ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय. ज्यांच्याशी बोललो त्या लोकांसोबत भेटी करून देईन. पहलगामची घटना घडल्यानंतर मला अनिल शिदोरेंचा मेसेज आला की, तुम्ही बोललात तसे झाले', असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल मोठे विधान केले. काश्मीरमध्ये पर्यटकांची हत्या करतील हे मला आधीच जाणवू लागलं होतं, असा दावा करताना त्यांनी यामागील कारणही सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात मुलाखत झाली. मुंबईतकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहलगामधील दहशतवादी हल्ल्याबद्दल एक मोठं विधान केले. 

वाचा >>'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान

राज ठाकरे म्हणाले, "मी काय म्हणालो आणि त्याचे तुम्ही काय अर्थ काढता. त्यावर मी तो अर्थ नाही, त्याचा अर्थ हा आहे, असे सांगायला मी का येऊ? आता पहलगामचं जेव्हा झालं. त्यानंतर मी बोललो. अनेकांना वाटलं की मी देशाच्या विरोधात काहीतरी बोललोय. कसलं देशाच्या विरोधात? माझी प्रतिक्रिया एकदा ऐका. ते सगळं झाल्यावर राज ठाकरे आठवला की युद्ध परवडणारे नाही. अनेक लोक बोलली मला. अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या", असे राज ठाकरे म्हणाले. 

युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल -राज ठाकरे

राज ठाकरेंनी पुढे बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, "तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही. ती व्यक्ती इथे नाहीये. अनेकजण आहेत. त्यांच्या मी तुम्हाला भेटी करून देईन. मी कोणी ज्योतिषी नव्हे. मी अनेकदा सांगितलं. मी मागच्या वेळीही सांगितलं होतं आठवतं तुम्हाला? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. तीन चार वर्षापूर्वी. यावेळी मी ही गोष्ट फक्त बोललो नाही."

राज ठाकरे म्हणाले, सत्य सांगतोय शपथपूर्वक सांगतोय

याच मुद्द्यावर ते पुढे म्हणाले, "याच कारण मला कोणत्याही प्रकारची हिंट द्यायची नव्हती. कारण राज ठाकरेंनी ही हिंट दिली असं व्हायला नको म्हणून मी सार्वजनिक ठिकाणी ही गोष्ट बोललो नाही. पण तुम्हाला जे सांगतोय आता, ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय. गेले वर्षभर आमचे अनिल शिदोरे असतील किंवा आमचे इतर... मी त्यांच्यासोबत तुमच्या भेटीही करून देईन."

"अनेकांशी मी वर्षभर बोलतोय की, काश्मीरमध्ये काहीतरी मोठी घटना घडेल. आणि मी हेही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील. ३७० कलम रद्द झाल्यानंतरची काश्मीरची जी परिस्थिती होती. आपले लोक तिकडे जात होते. खेळत होते. सगळ्या गोष्टी होत्या. मला ते जाणवत होतं काश्मीरबद्दलचं. काय आहे की, शांतता आणि सन्नाटामधील फरक तुम्हाला समजला पाहिजे", असे राज ठाकरे म्हणाले. 

हल्ला होईल असं राज ठाकरेंना का जाणवलं?

"शांतता ही आल्हाददायक असते. सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते. काश्मीरमध्ये मला जे जाणवत होतं, तो सन्नाटा होता. त्यातील बाहेर काय गोष्टी पडतील मला माहिती नाही. परंतू मी आता पण तुम्हाला मोबाईल दाखवयाला तयार आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, अनिल शिदोरेंचा मला मेसेज आला. तुम्ही बोललात तसे झाले. मी भविष्यवेत्ता नाही. माझे काही ठोकताळे आहेत. माझे काही अंदाज आहे. मला आतून काही गोष्टी वाटतात ही गोष्ट होईल. मी त्या प्रकारे सांगतो. मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही", असे राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरMNSमनसेterroristदहशतवादी