शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:00 IST

Raj Thackeray On Central Govt: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव सुरू असल्याचा केंद्र सरकारवर आरोप केला.

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईतील आयआयटीच्या कार्यक्रमात 'आयआयटीच्या नावातील 'बॉम्बे' तसंच ठेवले ते चांगले झाले,' असे विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानावरून केंद्र सरकारवर आणि भाजपच्या नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप करत, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप केला.

राज ठाकरे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून जितेंद्र सिंह यांच्या विधानाला सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक म्हटले आहे. ते म्हणाले की,"मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी नेत्यांनी व जनतेने मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव पूर्वी उधळून लावला होता. त्याबद्दलची गेली अनेक दशके यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे." राज ठाकरे यांनी डॉ. जितेंद्र सिंग यांच्यावरही निशाणा साधला. "जितेंद्र सिंग यांचा मुंबई किंवा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते येतात जम्मूमधून. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे ते ओळखून तसे बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे."

'मुंबई' नाव खुपतंय, शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न

राज ठाकरे यांनी 'मुंबई' हे नाव मुंबा आईच्या नावावरून आले आहे, म्हणून हे नाव केंद्राला खटकत असल्याचा दावा केला. "तुम्ही आणि तुमचे शहर यांना खुपतंय. आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला, त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी तात्पुरती माघार घेतली. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १०० टक्के शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉम्बे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे."

एमएमआर परिसर गुजरातला जोडण्याचा डाव?

या कटाचा उद्देश केवळ मुंबईपर्यंत मर्यादित नाही, तर संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई आणि एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांना 'आता तरी डोळे उघडा' असे भावनिक आवाहन केले आहे. "येथे आधीच केंद्रीय हस्तक, उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केले आहे, हे आपण रोज पाहतो आहोत, आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं!" असे राज ठाकरे यांनी 

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray alleges plot to separate Mumbai from Maharashtra.

Web Summary : Raj Thackeray accuses the central government of plotting to seize Mumbai. He claims the 'Bombay' name push is a ploy to control the city and potentially merge the MMR region with Gujarat, urging Mumbaikars to be vigilant.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसेPoliticsराजकारण