शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:05 IST

"यांनी कितीही जोड-तोड केलं, तरीही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे..."

राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीव मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा संपूर्ण राज्यभरात रंगत आहेत. मात्र असे असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानकपणे वांद्रे येथील ताज लँड्स अँडमध्ये भेटल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान रज-फडणवीस भेटीसंदर्भात काँग्रेस नेते नाता पटोले यांनी भाष्य केले आहे.

पटोले म्हणाले, "भाजप हा चोवीस तास राजकारण करणारा पक्ष आहे. सत्तेवर कसे यावे? यावर त्यांचे काम चालते आणि सत्तेवर आल्यानंतर, लुटपाट करून आपली घरे कसे भरता येतील? यावर काम करणारा हा पक्ष आहे. दुसऱ्याच्या घरी आग लावणे दुसऱ्याचे घर तोडणे, त्यात भाजप एक्सपर्ट आहे. कालपर्यंत हे राज ठाकरे यांना शिव्या घालत होते. कारण राजठाकरे यांनी, 'ऑपरेशन सिंदूर'संदर्भात जी काही भूमिका मांडली होती, त्यावरून त्यांना ट्रोल करणारी भाजपचीच मंडळी होती. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महागाई वाढत आहे. राज्यात हाहाकार आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही आणि ते पॉलिटिकल पोळ्या शेकायचेच काम करत असतील तर, त्यावर फार काही बोलावे असे मला वाटत नाही." ते टीव्ही९सोबत बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले, त्यांच्या (भाजप) डोक्यात २४ तास राजकारण सुरू असते. सत्ता कशी घेता येईल? यावर त्यांचे काम सुरू असते आणि मोजी असोत अथवा फडणवीसजी ते २४ तास तेच करत असतात. यासंदर्भात फार काही चर्चा करावी असे मला वाटत नाही. यामुळे मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, या सरकारने जोड-तोड करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी काहीही होणार नाही. महाराष्ट्रातील जनता या भ्रष्ट आणि धोकेबाज महायुतीच्या सरकारपासून त्रासलेली आहे. यामुळे राज्यातील जनतेने निर्णय केलेला आहे. या निवडणुका चारवर्षांनंतर होत आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात अशी सूचना देऊनही, या निवडणुकीला ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकायचे नाही. निवडणुका आपल्या सोयीप्रमाणे करायच्या, अशापद्धतीचे हे काम आहे. मात्र, यांनी कितीही जोड-तोड केलं, तरीही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरे