शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:29 IST

एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले. 

मुंबई - मुंबई अनेकदा आम्ही बंद होताना पाहिली. ही मुंबई शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे. मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे, ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज उठावा या अपेक्षा आमच्या राज ठाकरेंकडून आहेत. शेतकरी हा विषय एका पक्षाचा नाही, एका जातीधर्माचा नाही. शेतकरी सर्व जातीधर्माचा आहे. त्यामुळे मनसे यात पुढे आली तर निश्चितच शेतकरी आंदोलनाला बळ मिळेल. आमचा अजेंडा निवडणुकीचा नाही. मरणारा शेतकरी वाचवायचा आहे असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सांगितले. कडू यांनी मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. 

या भेटीत दोन्ही नेत्यांनी शेतकरी प्रश्नावर चर्चा केली. या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांचा विषय हाच आमच्यात संवाद होता. शेतकरी मुद्द्यावर कसं आणि कधी पुढे गेले पाहिजे, आंदोलन काय केले पाहिजे या सर्वांवर एकंदरीत चर्चा झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकार शेतकऱ्यांची टिंगलबाजी करतंय हे फार चुकीचे आहे. दुष्काळ पडला तर कर्जमाफीचा विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. दुष्काळ पडायची वाट शेतकऱ्यांनी पाहावी असं चित्र सरकारकडून उभे केले जात आहे. ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. दुष्काळापेक्षा जास्त नुकसान पिकाला भाव मिळत नाही म्हणून होत आहे. मागील २ वर्षापासून मालाचे दर घसरत आहेत. हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे. हा विषय महत्त्वाचा असल्याने मराठवाड्यात आमची शेतकऱ्यांसाठी यात्रा निघणार आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी आंदोलनाला यावे, शेतकऱ्यांना संबोधित करावे असं त्यांनी बैठकीत सांगितल्याचं म्हटलं.

तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन जात-धर्म, पक्ष विरहित असायला हवे. राजकारण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करायचे आहे. मेंढपाळ, मच्छिमार यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी विषयावर राज ठाकरेंचा अभ्यास दिसून आला. परंतु शेतकरी एकत्र येणार का अशी खंत आहे. शेतकरी एकत्र येत नाही आणि झाला तर राजकारणात होत नाही. शरद जोशींसारख्या माणसाला शेतकऱ्यांनी पाडले होते. हे दुर्दैवी होते. आम्ही लढतोय, राजू शेट्टी असतील ते शेतकऱ्यांसाठी लढा देत आहेत, ते राजकारणात मागेच राहिले आहेत. तरीही राजकारण बाजूला ठेवून शेतकरी लढा उभा राहावा हा आमचा प्रयत्न आहे. ९ तारखेला रक्षाबंधन आहे. आम्ही शेतकऱ्यांकडून सरकारला वेदनेची राखी बांधणार आहोत. आत्महत्या कुटुंबातील महिला राखी बांधतील. रोज १०-१५ शेतकरी आत्महत्या करतायेत. एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले. 

दरम्यान, आता निवडणूक आयोग म्हणतंय, VVPAT देणार नाही मग निवडणुकीला अर्थ काय, त्यापेक्षा भाजपा कार्यालयातून ठपके मारा आणि निवडणूक करा. ईव्हीएम मशिन असेल तर तुम्ही निवडणुका कशाला लढता, हे भय सामान्य नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आहे.  ही लोकभावना तयार होत आहे असा आरोप करत बच्चू कडू यांनी भाजपावर निशाणा साधला. 

३०-४५ मिनिटे झाली बैठक

काही दिवसांपूर्वी अमरावतीत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यात पदयात्रेत मी स्वत: आणि मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतरच्या चक्का जाम आंदोलनालाही पाठिंबा दिला होता. बच्चू कडू हे लढाऊ बाण्याचा व्यक्ती आहे. त्यांनी राज ठाकरेंशी भेटून शेतकरी विषयावर चर्चा केली. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्या दृष्टीने आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अर्धा पाऊण तास ही बैठक झाली. येणाऱ्या काळात मराठवाडा येथे शेतकरी आंदोलन उभे राहतंय. परभणीपासून पदयात्रा सुरू होतेय, त्याचं निमंत्रण राज ठाकरेंना दिली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.  

टॅग्स :MNSमनसेFarmerशेतकरीBacchu Kaduबच्चू कडूRaj Thackerayराज ठाकरेBala Nandgaonkarबाळा नांदगावकर