शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 05:48 IST

गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या तुफानी पावसाने  मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसराला झोडपून काढले.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर : गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या तुफानी पावसाने  मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसराला झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. तर यंत्रणांची तारांबळ उडाली. मुंबई परिसरातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर अनेक धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला. 

मुंबईत सखल भागांत पाणी साचले, रस्ते जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू होती, तर रेल्वे वाहतुकीलाही पावसामुळे लेटमार्क लागला. दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाली, तर या मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही बसला. गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दादर येथे नायगाव परिसरात पावसामुळे एक झाड कोसळले; मात्र जीवितहानी झाली नाही. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये ५६ टक्के पाणीसाठा झाला असून सात महिने पुरेल एवढा जलसंचय झाला आहे. 

रायगडात एकाचा मृत्यू 

  • जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला असून सावित्री, गांधारी, काळ, उल्हास, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. 
  • पेण तालुक्यातील खरोशी गावातील बाळगंगा नदीला आलेली भरती आणि पाऊस यामुळे गावात पाणी शिरल्याने रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. 
  • कर्जत तालुक्यातील दहिवलीतर्फे वरेडी-नेरळ रस्त्यावर उल्हास नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ते कळंब रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. घर पडल्याने जिल्ह्यात एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईला ऑरेंज तर पालघरला रेड अलर्टदक्षिण ओडिशा तटीय क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पूर्व आणि पश्चिमेकडील प्रदेशातील हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हीच परिस्थिती गुरुवारी कायम राहील. पालघर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यांना गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला असून, येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.   

वसईत दोघांचा मृत्यू वसईच्या राजावली परिसरातील वाघराळपाडा येथे बुधवारी सकाळी दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचविण्यात यश आले. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात बुधवारी दरड कोसळण्याची घटना घडली. या दरडीखाली एकाच घरातील चार जण अडकले होते. त्यातील अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) या दोघा बाप-लेकीचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला.  

पालघर जिल्ह्यात हाहाकारपावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तानसा, वैतरणा, गारगाई, पिंजाळी, देहर्जा या पाचही मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, विक्रमगड येथील धामणी धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्या नदीमध्ये धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार माजला असून, नद्या, नाले, धरणे तुडुंब भरली आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचा धोका लक्षात घेत ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व शाळांना दुपारी दोननंतर सुट्टी देण्यात आली.

नवी मुंबईत कोसळधारा 

  • नवी मुंबईसह पनवेलला मंगळवार रात्रीपासून बुधवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. यामुळे पनवेलमधील पाताळगंगा आणि गाढी या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पाताळगंगेच्या पुरामुळे डाेलघरमधील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. 
  • नवी मुंबईसह पनवेल परिसरात वृक्ष कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहेत. 

 

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईpalgharपालघरRaigadरायगड