शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परतीच्या पावसाचा दणका, खान्देशात मुसळधार : पुण्यात ढगफुटी, गोदावरीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 04:16 IST

राज्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्याला फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबादला पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने बुधवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात दाणादाण उडविली. वीज पडून यवतमाळमध्ये एक विद्यार्थिनी तर जगळगावला मेंढपाळाचा मृत्यू झाला. बीडमध्ये पुरात वाहून जाणा-या दोन शाळकरी मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुले बेपत्ता आहेत. उस्मानाबादमध्ये शेतकरी वाहून गेला. सोलापूरमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. बीड व उस्मानाबादेत अतिवृष्टी झाली व पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने मराठवाड्याला फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबादला पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला तर नाशिकला धो धो कोसळणा-या पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे.बीड जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळी तालुक्यातील नागापूर महसूल मंडळात सर्वाधिक १५५ मि.मी. पावसाची नोंद झाली. उस्मानाबादेत चार मंडळांत अतिवृष्टी झाली. पश्चिम वºहाडात दमदार पाऊस झाला. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे.खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. धुळे तालुक्यात अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला. पांझरा, बुराई नद्यांना पूर आला आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. मंचरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन वाहून गेली. भोर तालुक्यातील भुंगवली गावात ढगफुटी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोलापूरमध्ये पाऊस झाला. नाशिकमध्ये नद्या-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर तसेच दारणा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. पावसाने द्राक्ष, कांदा तसेच तूर, सोयाबीन, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.तिलारी धरण भरले-महाराष्ट्र आणि गोवा सरकारने संयुक्तरीत्या उभारलेले आणि या दोन्ही राज्यांच्या सीमेलगत असलेले तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण भरल्यामुळे गोमंतकीयांसमोरील पाण्याचा प्रश्न दूर होण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात झाला ढगफुटीसारखा पाऊस-पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला.भीमा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. नाशिकला सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात ३६ तासांत ५३६ मिमी पाऊस झाला. गोदावरी, दारणा नद्यांना पूर आला आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र