शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
2
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
3
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
4
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
5
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
6
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
7
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
8
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
9
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
10
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
11
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
12
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
13
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
14
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
15
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
16
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
17
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
18
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
19
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
20
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा दणका, खान्देशात मुसळधार : पुण्यात ढगफुटी, गोदावरीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 04:16 IST

राज्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्याला फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबादला पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने बुधवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात दाणादाण उडविली. वीज पडून यवतमाळमध्ये एक विद्यार्थिनी तर जगळगावला मेंढपाळाचा मृत्यू झाला. बीडमध्ये पुरात वाहून जाणा-या दोन शाळकरी मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुले बेपत्ता आहेत. उस्मानाबादमध्ये शेतकरी वाहून गेला. सोलापूरमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. बीड व उस्मानाबादेत अतिवृष्टी झाली व पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने मराठवाड्याला फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबादला पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला तर नाशिकला धो धो कोसळणा-या पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे.बीड जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळी तालुक्यातील नागापूर महसूल मंडळात सर्वाधिक १५५ मि.मी. पावसाची नोंद झाली. उस्मानाबादेत चार मंडळांत अतिवृष्टी झाली. पश्चिम वºहाडात दमदार पाऊस झाला. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे.खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. धुळे तालुक्यात अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला. पांझरा, बुराई नद्यांना पूर आला आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. मंचरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन वाहून गेली. भोर तालुक्यातील भुंगवली गावात ढगफुटी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोलापूरमध्ये पाऊस झाला. नाशिकमध्ये नद्या-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर तसेच दारणा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. पावसाने द्राक्ष, कांदा तसेच तूर, सोयाबीन, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.तिलारी धरण भरले-महाराष्ट्र आणि गोवा सरकारने संयुक्तरीत्या उभारलेले आणि या दोन्ही राज्यांच्या सीमेलगत असलेले तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण भरल्यामुळे गोमंतकीयांसमोरील पाण्याचा प्रश्न दूर होण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात झाला ढगफुटीसारखा पाऊस-पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला.भीमा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. नाशिकला सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात ३६ तासांत ५३६ मिमी पाऊस झाला. गोदावरी, दारणा नद्यांना पूर आला आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र