शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील गाळप हंगामावर ओल्या दुष्काळाचे संकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 12:34 IST

राज्यातील एकूण उत्पादनाच्या पंचवीस ते तीस टक्के साखरेचे उत्पादन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होते.

ठळक मुद्देअतिवृष्टीने नुकसानीचा अंदाज : साखर कारखान्यांना आढावा घेण्याची सूचना

पुणे : गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने यंदा गाळपासाठी गत हंगामापेक्षा पावणेचारशे लाख टन ऊस कमी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. कोल्हापूर आणि सांगली या ऊस लागवड क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे नुकसान झाल्याने गाळपासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाचे प्रमाण आणखी घटण्याची शक्यता आहे. मात्र, या नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यासाठी साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांना सूचना दिली आहे. येत्या २६ ऑगस्टला साखर आयुक्तालयात बोलावण्यात आलेल्या कारखानदारांच्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेतला जाईल. राज्यातील एकूण उत्पादनाच्या पंचवीस ते तीस टक्के साखरेचे उत्पादन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होते. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक साखर उत्पादन होते. या चारही जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला आहे. त्यातही सांगली आणि कोल्हापूर जिल्हे तर जवळपास आठवडाभर पाण्याखाली होते. या दोन जिल्ह्यांत पूराचा जास्त तडाखा बसला आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामामधे राज्यातील साखरेचे उत्पादन १०७ वरुन ७० लाख टनांपर्यंत खाली घसरेल, असा अंदाज साखर महासंघाने वर्तविला होता. लांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरु होत्या. त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ऊस गेला. त्यामुळे यंदा ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल, असे पुरस्थिती उद्भवण्या पुर्वी साखर आयुक्तालयाने सांगितले होते. पुरामुळे गाळपासाठी आणखी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे साखरेसह मळी, इथेनॉल, ब गॅस आणि कोजनचे उत्पादनही निम्म्याने घटेल असा अंदाज आहे. दरवर्षी साधारण ४४ ते ४५ लाख टन मळीचे उत्पादन होते. यंदा त्यात २० ते २२ लाख टनापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे. या बाबत माहिती देताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, अजूनही आम्ही ५७० लाख टन ऊस गाळप आणि ६३ लाख टन साखर उत्पादनावर ठाम आहोत. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी कृषी आणि साखर कारखान्यांकडेही विचारणा केली आहे. त्याचे पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे नुकसानीची माहिती प्राप्त होण्यासाठी आठ दिवस लागतील. ---------------गेल्या हंगामामधे राज्यात ९५१ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यातील २१५.९९ लाख टन कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात झाले आहे. त्यातून २६.७४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्याने अगामी हंगामात येथील उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे...............नुकसानीची अचूक माहिती घेण्याची सूचना साखर कारखान्यांना करण्यात आली आहे. यादृष्टीने २६ आॅगस्टला कारखान्यांच्या व्यवस्थापकांची बैठक बोलावण्यात आली आहे.  शेखर गायकवाड, साखर आयुक्त...........

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेfloodपूरFarmerशेतकरीRainपाऊस