शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
2
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
3
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
4
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
5
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
6
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
7
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
8
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
9
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
10
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
11
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
12
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
13
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
14
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
15
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
16
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
17
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
18
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
19
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
20
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
Daily Top 2Weekly Top 5

Raigad Landslide: रायगड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना केंद्राकडून २ लाख तर राज्याकडून ५ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:01 IST

PM Narendra Modi & CM Uddhav Thackeray Announced ex gratia: सध्या या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही दुर्घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.

ठळक मुद्देआपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोतपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भावनाराज्यात १० ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले.

नवी दिल्ली – कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत यात ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) ट्विट करून म्हटलंय की, रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरच बरे होतील ही सदिच्छा आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीवर केंद्र लक्ष ठेऊन जास्तीत जास्त मदत पूरग्रस्त भागांना पोहचवण्याचं काम केंद्र करत आहेत असं त्यांनी सांगितले. तसेच दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जे जखमी झालेत त्यांना ५० हजारांची मदत केंद्राकडून देण्यात येईल. सध्या या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही दुर्घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.

राज्य सरकारकडूनही मदत जाहीर

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) दिली आहे. त्याचसोबत जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील. आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

 

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरfloodपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी