शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

Raigad Landslide: रायगड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना केंद्राकडून २ लाख तर राज्याकडून ५ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:01 IST

PM Narendra Modi & CM Uddhav Thackeray Announced ex gratia: सध्या या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही दुर्घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.

ठळक मुद्देआपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोतपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भावनाराज्यात १० ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले.

नवी दिल्ली – कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत यात ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) ट्विट करून म्हटलंय की, रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरच बरे होतील ही सदिच्छा आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीवर केंद्र लक्ष ठेऊन जास्तीत जास्त मदत पूरग्रस्त भागांना पोहचवण्याचं काम केंद्र करत आहेत असं त्यांनी सांगितले. तसेच दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जे जखमी झालेत त्यांना ५० हजारांची मदत केंद्राकडून देण्यात येईल. सध्या या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही दुर्घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.

राज्य सरकारकडूनही मदत जाहीर

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) दिली आहे. त्याचसोबत जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील. आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

 

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरfloodपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी