शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 19:12 IST

Pune Accident News: पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अतिश्रीमंत उद्योगपतीच्या मद्यप्राशन केलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून अपघात घडवल्याने दुचाकीवरील तरुण, तरुणीचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवल्याने या घटनेची आता देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अतिश्रीमंत उद्योगपतीच्या मद्यप्राशन केलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून अपघात घडवल्याने दुचाकीवरील तरुण, तरुणीचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवल्याने या घटनेची आता देशभरात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारवर टीका केली होती.  बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. मात्र राहुल गांधी यांनी आरोपीबाबत केलेला हा दावा गैरसमजातून केला असल्याचं विधान प्रख्यात वकील असीम सरोदे यांनी केला आहे. 

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना असीम सरोदे म्हणाले की, राहुल गांधी यांचा गैरसमज झाला आहे. तसा तो सगळ्यांचाच झालेला आहे. या मुलाला केवळ जामीन दिलेला आहे. त्याला मोकळं सोडलेलं नाही. त्यामुळे जामीन करत असताना जुवेलनाईन जस्टिस अॅक्टमध्ये जामीन करताना सुधारणावादी शिक्षेची किंवा अटींची तरतूद आहे. त्यामुळे आरोपीला काही अटींवर सोडलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनीच निबंध लिहिला की सोडतील, असा जो काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे. त्यामुळे लोकांनी पण त्याबाबत विचार केला पाहिजे. तसेच राहुल गांधी यांनी जे काही ट्विट केलं आहे किंवा व्हिडीओ केला आहे. त्यामागेसुद्धा गैरसमज आहे, असं दिसतंय. आरोपीला सोडूनच दिलंय, असा त्यांचा समज झालेला आहे, असे असीम सरोदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की, जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसेल, जर तो १८ वर्षांच्या आत असेल, तरीही त्याला दारू पिण्यासाठी पबमध्ये जाऊ देणं. त्यानंतर त्याने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं हे सगळं पालक म्हणून त्यांच्या अपयशाचा भाग आहे. त्यामुळे या प्रकरणी पालकांची चौकशी झाली पाहिजे. तसेच कार विकत घेऊन एवढे दिवस झाल्यानंतरही तिची नोंदणी का करण्यात आली नाही, हा एक मुद्दा आहे आणि मुलाकडे लक्ष का दिलं नाही हाही मुद्दा आहे. यात कायद्याचे एक दोन मुद्दे आहेत जे कुणीच लक्षात आणून दिले नसतील. त्यानुसार या प्रकरणात दोन एफआयआर असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दारुबंदी कायद्याचं एकही कलम लावलेलं नाही, याकडेही असीम सरोदे यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, पुण्यातील घटनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातो. ट्रक आणि ओला चालकांना अशी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात नाही? न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असे राहुल गांधींनी म्हटलं होतं. 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हRahul Gandhiराहुल गांधीAsim Sarodeअसिम सराेदे