शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:03 IST

'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांकडे दुर्लक्ष करुन काँग्रेसशी तडजोड केली, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.'

JP Nadda : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व 288 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नवी मुंबईत जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. नड्डा म्हणाले, 'एनडीएने राजकारणाची नवी संस्कृती निर्माण केली आहे. '

आम्ही जे बोललो, ते केले...'आम्ही जनतेला उत्तरदायी सरकार देत आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि एनडीएने एक नवी संस्कृती, राजकारणाची नवी व्याख्या निर्माण केली आहे. केंद्र ते राज्य, आमच्या सरकारने जे सांगितले, ते सर्व केले आणि जे सांगितले नाही तेही केले,' असा दावा नड्डांनी यावेळी केला. 

राहुल गांधींवर काय म्हणाले?ते पुढे म्हणतात, 'आज राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरतात. मात्र त्यांनी राज्यघटना कधीच वाचली नाही, ते फक्त हातात घेऊन फिरतात. धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिले आहे, मात्र आज काँग्रेस पक्ष कर्नाटकात खाजगी कंत्राटदारांना टेंडर देताना अल्पसंख्याकांना 4 टक्के आरक्षण देत आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलजेपी नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मी आपला पक्ष बंद करेल, पण काँग्रेसशी तडजोड करणार नाही. पण आज उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे नेले. सत्तेसाठी तुमच्या वडिलांच्या विचारांकडे दुर्लक्ष करून तुम्ही काँग्रेसशी ज्या प्रकारे तडजोड केली आहे, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.'

आर्थिक आघाडीवर देश मजबूत झाला'आर्थिक धोरणाच्या आघाडीवर जगाला पंतप्रधान मोदींमध्ये आशेचा किरण दिसत आहे. 10 वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था 12 व्या क्रमांकावर होती, पंतप्रधान मोदींनी ती पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली. महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती हा महाराष्ट्राला उजळून टाकणारा 'उगवता सूर्य' आहे. तर महाविकास आघाडी महाराष्ट्राला अंधारात ढकलणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. तुम्ही महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन करा, पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,' असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४J P Naddaजगत प्रकाश नड्डाRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस