शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:03 IST

'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांकडे दुर्लक्ष करुन काँग्रेसशी तडजोड केली, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.'

JP Nadda : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व 288 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नवी मुंबईत जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. नड्डा म्हणाले, 'एनडीएने राजकारणाची नवी संस्कृती निर्माण केली आहे. '

आम्ही जे बोललो, ते केले...'आम्ही जनतेला उत्तरदायी सरकार देत आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि एनडीएने एक नवी संस्कृती, राजकारणाची नवी व्याख्या निर्माण केली आहे. केंद्र ते राज्य, आमच्या सरकारने जे सांगितले, ते सर्व केले आणि जे सांगितले नाही तेही केले,' असा दावा नड्डांनी यावेळी केला. 

राहुल गांधींवर काय म्हणाले?ते पुढे म्हणतात, 'आज राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरतात. मात्र त्यांनी राज्यघटना कधीच वाचली नाही, ते फक्त हातात घेऊन फिरतात. धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिले आहे, मात्र आज काँग्रेस पक्ष कर्नाटकात खाजगी कंत्राटदारांना टेंडर देताना अल्पसंख्याकांना 4 टक्के आरक्षण देत आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलजेपी नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मी आपला पक्ष बंद करेल, पण काँग्रेसशी तडजोड करणार नाही. पण आज उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे नेले. सत्तेसाठी तुमच्या वडिलांच्या विचारांकडे दुर्लक्ष करून तुम्ही काँग्रेसशी ज्या प्रकारे तडजोड केली आहे, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.'

आर्थिक आघाडीवर देश मजबूत झाला'आर्थिक धोरणाच्या आघाडीवर जगाला पंतप्रधान मोदींमध्ये आशेचा किरण दिसत आहे. 10 वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था 12 व्या क्रमांकावर होती, पंतप्रधान मोदींनी ती पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली. महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती हा महाराष्ट्राला उजळून टाकणारा 'उगवता सूर्य' आहे. तर महाविकास आघाडी महाराष्ट्राला अंधारात ढकलणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. तुम्ही महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन करा, पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,' असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४J P Naddaजगत प्रकाश नड्डाRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस