शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 16:06 IST

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेचा रणजीत सावरकरांनी समाचार घेतला.

मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आहेत. यात त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकरांनी इंग्रजांनी माफी मागितली, पेंशन घेतली आणि काँग्रेसविरोधात काम केले, असा आरोप राहुल यांनी केला. त्यावर सावरकरांचे पणतू रणजीत सावकर यांनी राहुल गांधींच्या अटकेची मागणी केली.

आज रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी प्रसार माध्यमांना बोलताना ते म्हणाले की, 'सावरकर बॅरिस्टर होते, त्यांना पैसे कमवायचे असते, तर त्यांनी लाखो रुपये कमवले असते. पण, चांगल्या आयुष्याचा त्याग करुन त्यांनी देशासाठी कष्ट भोगले. 13 वर्षे स्थानबद्धता आणि 14 वर्षे कारावास भोगलेले एकमेवर राजनेते होते. ते ब्रिटिशांकडून पेंशन घेत होते, असा त्यांचा अपमान केला जातो. राहुल गांधींनी आरोप करण्याचे जे पाप केले आहे, त्याविरोधात मी पोलिसांकडे राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केली आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातमी- "आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय"; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र

ते पुढे म्हणाले की, 'इंग्रजांच्या रेकॉर्डमध्ये सावरकर मोस्ट डेंजरस मॅन असा उल्लेख आहे. त्यांनी जे पत्र दाखवले, त्यांचा तो मूर्खपणाचा कळस आहे. या माणसाला पत्रात कोणता शब्द वापरतात, ते कळत नाही. पत्र लिहीण्याची पद्धत असते, मोस्ट ओबिडीयंट सर्वंटचा, मी तुमचा नोकर बनू इच्छितो, असे भाषांतर त्यांनी केले. त्याच काळात महात्मा गांधींचीही अशीच पत्रे आहेत. त्या काळात ही पत्र लिहिण्याची पद्धत होते. ही शिष्टाचाराची पद्धत होती, या मूर्खाला ते काय कळणार. भारतीयांनी अशा मूर्खांपासून लांब राहावे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

ते पुढे म्हणतात की, 'पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास करावा. राहुल गांधींनी सावरकरांना देशद्रोही म्हटले होते, त्याविरोधात तक्रार केली होती. तेव्हा भोईवाडा कोर्टातने तपास करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. आता मी त्याची प्रत मिळवली आहे. ही भारत तोडो यात्रा असेल, तर ती बंद करण्याची मागणी प्रत्येक राष्ट्रभक्ताने करावी. राहुल शेवाळे यांनी ती मागणी केलीये, ती योग्य आहे. हे सरकार न्यायाप्रमाणे वागेल, असा मला विश्वास आहे,' असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरcongressकाँग्रेसBJPभाजपाBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा