शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

FIR नोंदवण्यासाठीही आंदोलन करावे लागेल का?, बदलापूरमधील घटनेवर राहुल गांधींचा संताप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 19:58 IST

"समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? "

Rahul Gandhi on Badlapur Crime News : बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या अत्याचारानंतर सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे बदलापूरमधील हजारो नागरिक संतप्त झाले आणि अनेक तास बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन केले. याशिवाय, राज्यभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होतो. दरम्यान, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश

बदलापूरमधील लैंगिक शोषणाच्या घटनेबाबत राहुल गांधी यांनी सोशल मीडियाव पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला. "पश्चिम बंगाल, यूपी, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवर होणारे लज्जास्पद गुन्हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? बदलापुरातील दोन चिमुकलींवर घडलेल्या अत्याचारानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावे लागले. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? पीडितांना पोलिस ठाण्यात जाणेही इतके अवघड का झाले आहे?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

राहुल पुढे म्हणतात, "न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हा लपविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. एफआयआर न नोंदवल्याने फक्त पीडित हतबल होत नाहीत, तर गुन्हेगारांना अभय मिळते. समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, याचा सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही," असेही राहुल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

शाळेत काय घडले?बदलापुरातील एका विद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे(24) याने अत्याचार केला. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले. शाळेत तोडफोड केल्यानंतर काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला, दहा वाजता बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे वाहतूक आंदोलकांनी रोखली. परिणामी, अंबरनाथ स्थानकापुढील कर्जत, खोपोलीकडील रेल्वे वाहतूक वाम झाली. एकीकडे शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु होते, तर दुसरीकडे रेल रोको सुरू झाल्यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. 

आरोपीला फाशी देण्याची मागणीआंदोलकांशी चर्चा करण्याकरिता मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ), जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलिस आयुक आशुतोष डुब्बरे यांनीही धाव घेतली. मात्र, त्यांनाही फारसे यश आले नाही. मंत्री बोलत असताना फाशी. फाशी.. अशा घोषणा दिल्या जात होत्या. अत्याचाराचे खटले फास्ट ट्राकवर चालविण्याचे आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल, याचे आश्वासन महाजन व शिनगारे देत होते. मात्र, आंदोलक जस्टिस जस्टिस…अशा घोषणा देत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी तब्बल ताराभर आंदोलकांशी चर्चा केली. ते आंदोलकांना वारंवार शांत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आंदोलक ऐकत नव्हते. लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदोलकांशी चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतरही आंदोलन मागे घेतले जात नसल्याने पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास लाठीमार करावा लागला. 

पीडित कुटुंबाचं राज ठाकरेंना पत्र अन् मनसेमुळे बदलापूर प्रकरणाला वाचा फुटली, 'असा' होता घटनाक्रम

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbadlapurबदलापूरcongressकाँग्रेसBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी