शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

FIR नोंदवण्यासाठीही आंदोलन करावे लागेल का?, बदलापूरमधील घटनेवर राहुल गांधींचा संताप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 19:58 IST

"समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? "

Rahul Gandhi on Badlapur Crime News : बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या अत्याचारानंतर सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे बदलापूरमधील हजारो नागरिक संतप्त झाले आणि अनेक तास बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन केले. याशिवाय, राज्यभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होतो. दरम्यान, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश

बदलापूरमधील लैंगिक शोषणाच्या घटनेबाबत राहुल गांधी यांनी सोशल मीडियाव पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला. "पश्चिम बंगाल, यूपी, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवर होणारे लज्जास्पद गुन्हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? बदलापुरातील दोन चिमुकलींवर घडलेल्या अत्याचारानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावे लागले. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? पीडितांना पोलिस ठाण्यात जाणेही इतके अवघड का झाले आहे?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

राहुल पुढे म्हणतात, "न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हा लपविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. एफआयआर न नोंदवल्याने फक्त पीडित हतबल होत नाहीत, तर गुन्हेगारांना अभय मिळते. समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, याचा सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही," असेही राहुल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

शाळेत काय घडले?बदलापुरातील एका विद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे(24) याने अत्याचार केला. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले. शाळेत तोडफोड केल्यानंतर काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला, दहा वाजता बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे वाहतूक आंदोलकांनी रोखली. परिणामी, अंबरनाथ स्थानकापुढील कर्जत, खोपोलीकडील रेल्वे वाहतूक वाम झाली. एकीकडे शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु होते, तर दुसरीकडे रेल रोको सुरू झाल्यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. 

आरोपीला फाशी देण्याची मागणीआंदोलकांशी चर्चा करण्याकरिता मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ), जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलिस आयुक आशुतोष डुब्बरे यांनीही धाव घेतली. मात्र, त्यांनाही फारसे यश आले नाही. मंत्री बोलत असताना फाशी. फाशी.. अशा घोषणा दिल्या जात होत्या. अत्याचाराचे खटले फास्ट ट्राकवर चालविण्याचे आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल, याचे आश्वासन महाजन व शिनगारे देत होते. मात्र, आंदोलक जस्टिस जस्टिस…अशा घोषणा देत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी तब्बल ताराभर आंदोलकांशी चर्चा केली. ते आंदोलकांना वारंवार शांत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आंदोलक ऐकत नव्हते. लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदोलकांशी चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतरही आंदोलन मागे घेतले जात नसल्याने पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास लाठीमार करावा लागला. 

पीडित कुटुंबाचं राज ठाकरेंना पत्र अन् मनसेमुळे बदलापूर प्रकरणाला वाचा फुटली, 'असा' होता घटनाक्रम

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbadlapurबदलापूरcongressकाँग्रेसBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी