शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय"; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:52 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

शेगाव:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज (17 नोव्हेंबर, गुरुवार) 11 वा दिवस आहे. दुपारी एक वाजता त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याचा पुनरुच्चार केला. राहुल गांधी म्हणाले, 'माझ्याकडे सावरकरजींचे पत्र आहे, जे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला लिहिले होते. त्यात त्यांनी इंग्रजांना सेवक होण्याची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणि मोहन भागवत यांनी हे पत्र पाहावे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती,' असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

संबंधित बातमी- अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली आणि त्यांच्याकडून पेन्शन घेतली, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. विशेष म्हणजे, कालच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या विचारांना जमिनीखाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली होती. यावर राहुल गांधी म्हणाले की, हिम्मत असेल तर आमची यात्रा थांबवून दाखवा. 

'गांधी, नेहरू, पटेल झुकले नाहीत'पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, 'या पत्रावर सावरकरजींनी सही केली होती. गांधीजी, नेहरूजी आणि पटेलजीही तुरुंगात होते, अशा पत्रावर कोणीही सही केली नव्हती,' असंही राहुल म्हणाले. तसेच, 'या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे, असे त्यांना वाटत असेल तर यात्रा थांबवून दाखवावी. आमच्या राजकारणात आणि भाजपच्या राजकारणात हाच फरक आहे. भाजप दबाव टाकत आहे, आम्ही हुकूमशाही मानत नाही,' अशी टीकाही राहुल यांनी केली. 

'भाजप हुकूमशाही पद्धतीने काम करेत'राहुल पुढे म्हणाले की, 'आम्ही भारत जोडो यात्रा कोणत्याही स्वार्थासाठी करत नाही आहोत. आम्ही सप्टेंबरमध्ये हा प्रवास सुरू केला, या प्रवासात आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर जाणार आहोत. यामागे आमचा निवडणूक जिंकण्याचा किंवा इतर काही हेतू नाही. भाजपचे राजकारण द्वेष, भीती आणि हिंसेने भरलेले आहे. याविरोधात आमची भारत जोडो यात्रा आहे. या यात्रेची गरज नसती, तर लाखो लोक  यात्रेत सहभागी झाले नसते,' असंही राहुल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा