शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय"; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:52 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

शेगाव:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज (17 नोव्हेंबर, गुरुवार) 11 वा दिवस आहे. दुपारी एक वाजता त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याचा पुनरुच्चार केला. राहुल गांधी म्हणाले, 'माझ्याकडे सावरकरजींचे पत्र आहे, जे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला लिहिले होते. त्यात त्यांनी इंग्रजांना सेवक होण्याची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणि मोहन भागवत यांनी हे पत्र पाहावे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती,' असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

संबंधित बातमी- अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली आणि त्यांच्याकडून पेन्शन घेतली, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. विशेष म्हणजे, कालच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या विचारांना जमिनीखाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली होती. यावर राहुल गांधी म्हणाले की, हिम्मत असेल तर आमची यात्रा थांबवून दाखवा. 

'गांधी, नेहरू, पटेल झुकले नाहीत'पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, 'या पत्रावर सावरकरजींनी सही केली होती. गांधीजी, नेहरूजी आणि पटेलजीही तुरुंगात होते, अशा पत्रावर कोणीही सही केली नव्हती,' असंही राहुल म्हणाले. तसेच, 'या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे, असे त्यांना वाटत असेल तर यात्रा थांबवून दाखवावी. आमच्या राजकारणात आणि भाजपच्या राजकारणात हाच फरक आहे. भाजप दबाव टाकत आहे, आम्ही हुकूमशाही मानत नाही,' अशी टीकाही राहुल यांनी केली. 

'भाजप हुकूमशाही पद्धतीने काम करेत'राहुल पुढे म्हणाले की, 'आम्ही भारत जोडो यात्रा कोणत्याही स्वार्थासाठी करत नाही आहोत. आम्ही सप्टेंबरमध्ये हा प्रवास सुरू केला, या प्रवासात आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर जाणार आहोत. यामागे आमचा निवडणूक जिंकण्याचा किंवा इतर काही हेतू नाही. भाजपचे राजकारण द्वेष, भीती आणि हिंसेने भरलेले आहे. याविरोधात आमची भारत जोडो यात्रा आहे. या यात्रेची गरज नसती, तर लाखो लोक  यात्रेत सहभागी झाले नसते,' असंही राहुल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा