शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

‘गांधी मला भेटला होता’चा खटला फक्त कवीवरच

By admin | Updated: May 15, 2015 02:00 IST

साहित्यिक अभिव्यक्तीच्या नावाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासारख्या ऐतिहासिक आदरणीय व्यक्तीचे काल्पनिक पात्र रंगवून

मुंबई : साहित्यिक अभिव्यक्तीच्या नावाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासारख्या ऐतिहासिक आदरणीय व्यक्तीचे काल्पनिक पात्र रंगवून त्या पात्राच्या तोंडी अश्लिल भाषा घालण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत हे बसत नसल्याने अशी व्यक्ती भादंवि कलम २९२ अन्वये अश्लिल साहित्याच्या मुद्रण-प्रकाशनासंबंधीच्या फौजदारी गुन्ह्याच्या कारवाईस पात्र ठरते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिली.वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या ‘गांधी मला भेटला होता’ या दीर्घकवितेवरून लातूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात गेली २१ वर्षे सुरु असलेल्या खटल्याच्या संदर्भात न्या. दीपक मिश्रा आणि न्या. प्रफुल्ल चंद्र पंत यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.१९८० च्या अंबेजोगाई येथील अ.भा. मराठी साहित्य सम्मेलनात गुर्जर यांनी ही कविता सर्वप्रथम सादर केली होती व २ आॅक्टोबर ९६ रोजी ती छापील स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. मात्र बँक आॅफ महाराष्ट्रच्या अ.भा. बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संल्गन कर्मचारी संघटनेने त्यांच्या ‘बुलेटिन’ या अंतर्गत द्वैमासिकाच्या जुलै-आॅगस्ट १९९४ च्या अंकात या कवितेचे पुनर्प्रकाशन केल्यावरून हा खटला दाखल केला गेला होता.पतीत पावन संघटनेचे कार्यकर्त विद्याधर अनासकर यांनी यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांकडे फिर्याद दाखल केली होती. ती लातूर येथे वर्ग केली गेली व तेथे भादंवि कलम १५३ ए, १५३ बी व २९२ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. त्यातून संदर्भीत बुलेटिनचे प्रकाशक देवीदास रामचंद्र तुळजापूरकर (सिडको, औरंगाबाद), मुद्रक धनंजय दादासाहेब कुलकर्णी (लातूर) व कवी वसंत गुर्जर (गिरगाव, मुंबई) यांच्याविरुद्ध लातूर दंडाधिकारी न्यायालयात खटला गुदरला गेला. तुळजापूर व कुलकर्णी यांनी केलेला अर्ज मंजूर करून दंडाधिकाऱ्यांनी खटल्यातून १५३ ए व १५३ बी ही कलमे रद्द केली. मात्र कलम २९२ मधून आरोपमुक्त करण्यास त्यांनी नकार दिला. लातूर सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही तोच निर्णय कायम ठेवल्याने तुळजापूर यांनी २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.ही कविता प्रसिद्ध झाल्यावर बँक कर्मचाऱ्यांच्या एका वर्गात त्यावर उमटलेल्या प्रतिकूल प्रतिक्रिया लक्षात घेऊन तुळजापूरकर यांनी बुलेटिनच्या लगेचच्या अंकात व पतीत पावन संघटनेने तक्रार करण्याच्या बरेच आधी त्याबद्दल दिलगिरी प्रकाशित केली होती. मुद्रकाने केवळ प्रकाशकाने दिलेला मजकूर छापून देण्याचे काम केले होते. शिवाय या सर्वाला आता २० वर्षांचा काळ उलटून गेला आहे. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने तुळजापूरकर व कुलकर्णी यांना खटल्यातून आरोपमुक्त केले. परिणामी आपल्याविरुद्धचा खटला रद्द करावा, असा अर्ज न करताही कुलकर्णी आरोपमुक्त झाले. याउलट कवी गुर्जर यांनी त्यांच्यावरील खटला रद्द करावा, असा अर्ज आजवर कोणत्याही न्यायालयात केलेला नाही व त्यांच्यावरील खटला सुरुच आहे. तरीही त्यांच्यावर खटला सुरुच राहील व त्यांनी आपला बचाव दंडाधिकाऱ्यांपुढे करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)