शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकरांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 6:04 PM

मोदींना निवडून दिले म्हणून आपण पंतप्रधान मानतो परंतु मी त्याला पाहू शकत नाही, गुजरातमध्ये दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहिती झाला नसता अशी टीका सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी केली.

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अडचण आली होती. जेव्हा जेव्हा देशासमोर अडचण आली तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी साहेब झालेत, आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.  

'अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब' या कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर बोलत होते. खेडेकर म्हणाले की, संपूर्ण देशाला आवश्यक असलेला असा हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे. जागतिक तरुणाईचं आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. तुमची अस्वस्थता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा अडचण आली होती. या देशाचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र अडचणीत आलेला आहे. आजचे शिवाजी साहेब झालेत. आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही एवढे आपल्या कृतीतून आपण दाखवून द्यावे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत तुमचे प्रश्न आम्हाला माहिती आहे. तुमचे भविष्य धोक्यात आहे. जे बुद्धी चालवणार नाहीत अशी तरुणाई सत्ताधाऱ्यांना हवेत. सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. राजकारणात सर्व गोष्टीचे अंतिम निर्णय होतात. त्यामुळे राजकारणापासून दूर राहू शकत नाही. व्यापारी लॉबी देशावर राज्य करतेय. जनतेचे देणंघेणं राहिले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात मनोरंजनच जास्त झालंय. या स्थितीत शहाणपणानं हे आव्हान स्वीकारावं लागेल. कुठल्याही समाजावर संकट आलं तर तिथली तरुणाई हे संकट अंगावर घेत असते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आम्ही होतो. तेव्हा महाराष्ट्रात जात गायब झाली होती. आपलं द्विभाषिक राज्य होते. गुजरातचं ओझं बाजूला काढून आपल्याला मुंबईसह संयुक्त राज्य हवं होते. आव्हान स्वीकारत नाही तो तरुण असू शकत नाही असं सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी म्हटलं. 

दरम्यान, देशाला व्यापारी कचाट्यातून मुक्त करायचं आहे असं हल्लाबोल करायचा आहे. आणीबाणीच्या काळात तरुणाईनं आंदोलन हाती घेतले होते. ती निवडणूक तरुणाईने हातात घेतली. आता तीच वेळ महाराष्ट्रावर आली आहे. विरोधी पक्ष कमकुवत झालेत. त्यामुळे कमळ उगवलं आहे. धर्माच्या नावाखाली लोकांचे मेंदू बंद करणे, बाकीच्या लोकांना सर्वधर्म चाललं मग आत्ताच का अडचण आली? जातीद्वेष आता वाढला आहे. सरकार खड्डणीबहाद्दर आहे. दगडाला शेंदूर फासून सत्ताधारी कुणीही उमेदवार देतात. आपला बेस्ट उमेदवार हे समजून काम केले. धंगेकर हे अनुभवातून शिकले आहेत. ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे केल्यानंतर शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या. बहुतेक देशात स्पर्धा परिक्षांच्या मुलांच्या आत्महत्येची लाट येण्याची शक्यता आहे. इतकी निराशा आता आहे. इतका छळ सुरू आहे. पण याचेच रुपांतर पराक्रमात करता येते असं आवाहनही सप्तर्षी यांनी केले. 

हिंदुत्व म्हणजे हिंसा, द्वेष

हिंदू आणि राम यांचा सुतराम संबंध नाही म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचा बिल्कुल संबंध नाही. हिंदु धर्म सहनशीलता, प्रेम, शेजारधर्म हे शिकवतो म्हणून आजपर्यंत सगळे मित्रत्वाने राहिले. हिंदुत्व म्हणजे हिंसा, द्वेष, दुसरेच माणूसच नाहीत. मोदींना निवडून दिले म्हणून आपण पंतप्रधान मानतो परंतु मी त्याला पाहू शकत नाही. आम्ही गुजरातमध्ये दंग्यानंतर काम करायला गेलो होतो. भट्टीमध्ये ८-८ माणसं टाकली. जर तो दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहिती झाला नसता अशी टीका कुमार सप्तर्षी यांनी केली. 

पुण्यात जो निवडून येतो, त्याचं सरकार देशात येते

गेल्या ३०-४० पुण्यात जो खासदार निवडून येतो, त्याचे देशात राज्य येते. पुण्यातील लोकांवर विशेष जबाबदारी आहे. कलमाडी आले तेव्हा देशात युपीए आले, इथं बापट आले तेव्हा वर मोदी आले. शिरोळे आले तर अटल येतात. त्यामुळे फक्त पुण्यात काम करून आपण देशात राज्य आणू शकतो. ते आपल्याला करायचं आहे. धंगेकर निवडून आले तर मोदी जातील आणि धंगेकर पडले तर मोदी येतील. हे सत्य लक्षात ठेवा, मतदान आपलं नसते, इतरांनाही पटवावं लागतं. परिवर्तनाची लाट तरुणांनी अंगावर घ्यावी असं आवाहन कुमार सप्तर्षी यांनी केले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKumar Saptarshiकुमार सप्तर्षीNCPराष्ट्रवादी काँग्रेस