शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:03 IST

मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले.

मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. अनेकांची घरे बुडाली आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारकडे मदतीची मागणी सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर आलेल्या भागात पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी  बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल,असे आश्वासन दिले. दरम्यान, आता मदतीवरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी सरकारला सवाल केले आहेत. 

मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध

"मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या ९०-९५ वर्षांत कधीही न पाहिलेली पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महापूराची भीषणता भयंकर आहे. या महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत आणि गाळाने भरल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे बार्शी तालुक्यातील दहिटणे, म्हात्रीवाडी आणि नारी या गावांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने आणि जगण्यासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. "आज पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करत असेल एका हेक्टरला, तर मग महाराष्ट्रानं साडेआठ हजार रुपये का करावे?, असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.

शेतकऱ्यांना मदत मागणे यात राजकारण आहे का?

"सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु आता मुख्यमंत्री महोदयांनी 'योग्य वेळी देऊ' असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणतीही निवडणूक नसताना कर्जमाफी दिली होती, शासनाकडे पैसे नसतील तर कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली. शेतकऱ्यांना मदत मागणे यात राजकारण आहे का?, असा सवालही त्यांनी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Why Maharashtra gives only ₹8500, when Punjab gives ₹50000?

Web Summary : Omraje Nimbalkar questions Maharashtra govt's ₹8500/hectare aid, contrasting it with Punjab's ₹50000, amid flood devastation in Marathwada and Solapur. Farmers demand increased financial assistance due to crop and land damage. He urges the government to provide immediate relief, even by taking loans.
टॅग्स :omraje nimbalkarओमराजे निंबाळकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस