शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 11:44 IST

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर सुनावणी घेतली जात आहे. पावसाळ्यापर्यंत ही सुनावणी पूर्ण होणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे मतमराठा समाजाचे वास्तववादी सर्वेक्षण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर सुनावणी घेतली जात आहे. मराठा समाजासह राज्यातील सर्वच समाजाची मते जाणून घेतली जात आहेत. औरंगाबादची सुनावणी आटोपली. बुधवारी नागपूरची सुनावणी घेतली. पुढे अमरावती, नाशिक, पुणे, कोकण आदी विभागात सुनावणी घेतली जाईल. पावसाळ्यापर्यंत ही सुनावणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर आयोगातर्फे लवकरात लवकर अहवाल राज्य शासनाकडे सोपविला जाईल, असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी सांगितले.मराठा समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून बुधवारी रविभवन येथे जनसुनावणी घेण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या उपस्थितीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जनसुनावणी झाली. या वेळी आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, सदस्य सचिव डी.डी. देशमुख, सदस्य प्रा. चंद्र्रशेखर देशपांडे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, डॉ. प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, डॉ. सुवर्णा रावळ, प्रा. राजाभाऊ करपे, सदस्य सचिव डी.डी. देशमुख उपस्थित होते. सुनावणीदरम्यान मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांनी आरक्षणाची मागणी करीत ते देण्याची गरज का आहे, याचे विवेचन आयोगासमोर केले. ओबीसींसह विविध जातीच्या संघटनांनीही आपली बाजू मांडली.दरम्यान पत्रकारांशी बोलताना आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड म्हणाले, राज्यातील मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यासाठी आयोगाच्या नियंत्रणासाठी एजंसी नेमून सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पाच तालुके व प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची निवड करण्यात येत आहे.मराठा समाजाची लोकसंख्या जास्त असलेली गावे सर्वेक्षणासाठी निवडली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातून एक महापालिका व एका नगर परिषदेची निवड करण्यात आली आहे. संबंधित एजंसी राज्यभरातील सर्वेक्षण करून आपला अहवाल आकडेवारीसह आयोगाकडे सादर करेल.आयोग त्या अहवालाचा सखोल अभ्यास करेल. वास्तविकता जाणून घेईल व त्यानंतर सरकारला आपला अहवाल सादर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात विशेष काळजी घेणारविदर्भात मराठा समाजाची संख्या कमी आहे. येथे बहुसंख्य कुणबी समाज आहे. त्यामुळे विदर्भात सर्वेक्षण करताना शैक्षणिक कागदत्र व आवश्यक दस्तावेज तपासले जातील. घराघरांना भेटी देऊन, खातरजमा करून पारदर्शी व वास्तववादी सर्वेक्षण केले जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.

सर्वच समाजाची सकारात्मक भूमिकामराठा समाजाला आरक्षण देऊच नका, अशी भूमिका आजवर कुणीही आयोगाकडे मांडलेली नाही. ओसीबी संघटनांसह विविध समाज संघटनांनी मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यात समाविष्ट न करता स्वतंत्र वेगळे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. सर्वच समाज या मुद्यावर सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे, असेही आयोगाने नमूद केले.

टॅग्स :marathaमराठा