शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याचा अमेरिकेत डंका.. हळद रसाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 12:01 IST

शहरातील वाहनांची गर्दी, उद्योगांमुळे प्रदूषणाचे प्रमाण मोठे असून नॅनो टेक्नोलॉजीद्वारे तयार केलेला हळदीचा रस प्रदूषणाच्या दुष्परिणामांसाठी प्रतिबंधक ठरू शकतो.

ठळक मुद्दे- नॅनो टेक्नोलॉजीद्वारे हळदीवर संशोधननॅनो टेक्नॉलॉजीमुळे एक किलो हळदीत असणारे कर्क्युमिन एका चमच्यात आणण्यात यश या शोधाचे ग्लोबल पेटंट मिळवण्याची प्रक्रियाही सुरु हळद रसाचे सेवन केल्यास प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे विपरित परिणाम टाळणे सहज शक्य

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून नॅनो-बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेले डॉ. विजय कनुरू यांनी नॅनोटेक्नोलॉजीचा वापर करून हळदीवर संशोधन केले आहे. एरवी पाण्यात अजिबात न विरघळणाऱ्या हळदीला डॉ. कनुरू यांनी आपल्या संशोधनाद्वारे हळद रसाचे स्वरूप दिले आहे. हा रस पाण्यात विरघळण्याजोगा असून त्यातून कर्क्युमिन हे औषधी द्रव्य पुरेशा प्रमाणात मिळते. त्यामुळे दररोज सकाळी केवळ १ ते २ चमचे हळद रसाचे सेवन केल्यास दैनंदिन प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे अनेक विपरित परिणाम टाळणे सहज शक्य असल्याचे डॉ. कनुरू यांनी सांगितले.   या हळद रसाला त्यांंनी '' हरस टर्मेरिक ज्यूस'' असे नाव दिले असून डेली डीटॉक्सचे फायदे मिळवण्यासाठी त्याचे सेवन उपयुक्त ठरते, असे डॉ. कनुरू यांनी सांगितले. ते म्हणाले, शहरातील वाहनांची गर्दी, उद्योगांमुळे होणारे प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर होणारी बांधकामे यामुळे हवेत प्रदूषणाचे प्रमाण मोठे असते. प्रवास वा कामाच्या निमित्ताने बराच वेळ प्रदूषित हवेत राहावे लागल्यानंतर शारीरिक व मानसिक थकवा आणि तणाव जाणवतो. पीएम २.५ अर्थात अतिसूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांवाटे रक्तात मिसळत असल्यामुळे ते अधिक त्रासदायक ठरतात. अशा प्रदूषणाच्या त्रासामुळे शरीरात ठिकठिकाणी सूज येऊ शकते, तसेच ह्रदयाच्या रक्तवाहिन्या, यकृत आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होतात. पुण्यात या प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण मोठे असून नॅनो टेक्नोलॉजीद्वारे तयार केलेला हळदीचा रस प्रदूषणाच्या दुष्परिणामांसाठी प्रतिबंधक ठरू शकतो. या रसामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता साधली जाते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि त्वचा निरोगी होण्यासाठीही याची मोठी मदत होते, असे ते म्हणाले. आपल्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश असला तरी त्यातून आपल्याला मिळणा-या कर्क्युमिन या औषधी द्रव्याची मात्रा फारच कमी असते. शिवाय जे औषधी गुण त्यातून मिळतात ते शरीरात पूर्णत: शोषले जात नाहीत, असेही डॉ. कनुरू यांनी सांगितले. हळद रसाच्या निर्मितीत नॅनोटेक्नोलॉजीचा वापर झाल्यामुळे त्यात कर्क्युमिन द्रव्याचे प्रमाण चांगले राखता आले, शिवाय ते पेशींमध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते, असे ते म्हणाले. 

.........एक किलो हळद एका चमच्यातनॅनो टेक्नॉलॉजीमुळे एक किलो हळदीत असणारे कर्क्युमिन एका चमच्यात आणण्यात यश मिळाले आहे. एरवी एखादा माणूस दिवसाला एक किलो हळद खाऊ शकत नाही. परंतु, एक चमचा हळद रस सहज घेऊ शकतो. शिवाय या रसामध्ये हळदीचा कडवट, उग्रपणाही नसतो. नुसती हळद खाल्ली तर ती पचण्यास जड असते. हळद रसामुळे हळदीचे सर्व पोषक गुणधर्म शरीरात सहजपणे शोषले जातात. हळदीच्या अनोख्या गुणधर्मांचा फायदा मिळवून देणाऱ्या हळद रसाच्या व्यावसायिक उपयोगासाठी इंग्लंडमधल्या किंग्ज कॉलेज, केंब्रिज युनिव्हर्सिटीने रस दाखवला आहे. या शोधाचे ग्लोबल पेटंट मिळवण्याची प्रक्रियाही मी चालू केली आहे.-डॉ. विजय कनुरु

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ