शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

पंतप्रधान मोदी संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले - छगन भुजबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 13:33 IST

Chhagan Bhujbal on Maharashtra Political Crisis: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना महाराष्ट्राबाहेर नेलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

याच पार्श्वभूमीवर  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देहू येथे झालेल्या एका कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. हाच धागा पकडत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामांच्या भेटीला देहूत आले आणि एकनाथाला घेऊन गेले. काय काय होते ते आधी बघू या. सरकारमध्ये राहणे, सरकार पडणे, नवीन पद्धतीने लढणे, मताधिक्य आणणे या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाहीत. शरद पवार यांना असे प्रसंग नवीन नाही." तसेच, छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर विस्तारीत भाष्य करणे टाळले. मात्र, काही काळ वाट पाहू सर्व चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. 

पत्रकारांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, मध्यावधी लागू दे, उद्या लागू दे अथवा परवा लागू द्यात. राजकीय पक्षांनी नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिले पाहिजे. सरकारवर संकट येईल असे आम्हाला वाटले नव्हते. शरद पवार यांच्या बरोबर आमची बैठक होईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज महाविकासआघाडी सरकारची आज एक मंत्रिमंडळ बैठक पार होणार आहे. या बैठकीबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता, सर्व काही ठिक असल्याचे वाटत आहे. मला आजचीही मंत्रिमंडळ बैठक नेहमीचीच असल्यासारखे वाटत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर मी भाष्य करणार नाही. आमचे सर्वोच्च नेते शरद पवार आज मुंबईत आहेत. त्यांची बैठक होईल. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. याशिवाय, शिवसेनेत जे घडले ते अनपेक्षित आहे. सर्व काही सुरळीत आहे, असे वाटत असताना अचानकच असे काही घडले, असेही छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.." असे ट्विट केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडी