शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या कर्जमाफीची प्रक्रिया दीडवर्ष चालली; आम्ही दोनच महिन्यांत संपवणार : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 13:12 IST

नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

मुंबई - उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसून येत आहे. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा उल्लेख करताना, कर्जमाफीची प्रक्रिया दोनच महिन्यात पूर्ण करण्याचे टार्गेट महाविकास आघाडीने ठेवल्याचे अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कर्जमाफीच्या मुद्दावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर चोख प्रत्युत्तर दिले. आधीच्या फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफी केली. मात्र त्यात अनेक त्रुटी होत्या. तब्बल 26 वेळा कर्जमाफीच्या आदेशात बदल करण्यात आले. त्यामुळे शेतकरी गोंधळून गेले होते. दररोज नवनवीन आदेश येत होते. तसेच भाजपने केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया दीड वर्षे नव्हे तर सरकार जाईपर्यंत सुरू होती, असा टोला अजित पवार यांनी लागवला. 

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया आम्ही तीन महिन्यात संपविणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ दोनच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे दोन महिन्यात शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने अंतर्गत, शेतकऱ्यांनी 2015 ते 2019 या कालावधी घेतलेल्या 2 लाखापर्यंतच्या कर्जाची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.