शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

सध्याचे शासन शेतकरी विरोधी - अजित पवार यांचा आरोप

By admin | Updated: October 10, 2016 20:09 IST

डाळीचे भाव वाढत नाही, त्यातच शासनाने डाळ आयात करुन डाळीचे भाव पाडले. कांद्याला पाच रुपये किलोचा सुद्धा भाव मिळेना, टोमॅटो, मिरची मातीमोल भावाने विकण्याची

ऑनलाइन लोकमतसिंदखेडराजा, दि. 10 -  डाळीचे भाव वाढत नाही, त्यातच शासनाने डाळ आयात करुन डाळीचे भाव पाडले. कांद्याला पाच रुपये किलोचा सुद्धा भाव मिळेना, टोमॅटो, मिरची मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी कच शेती केली नाही, त्यांना शेतीची जाण नाही. तसेच हे शासन उद्योगधार्जिणे असून, शेतीविरोधी असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सिंदखेड राजा येथे केला.स्थानिक पंचायत समितीच्या प्रांगणावर १० आॅक्टोबर रोजी सहकार महर्षी कै.भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री राजेश टोपे यांचीउपस्थिती होती. फळबाग, नेटशेड, सेंद्रीय शेती, दुध, सिताफळ, आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करुन उत्पादन काढणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा स्मृतीचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान यावेळी सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, की सध्या दुधाला १८ रुपये भाव तर पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते. शेतकरी शेतमजुराला बँकेत खाते काढायला लावले. १५ लाख एका खात्यात जमा करण्याची घोषणा फोल ठरली. सरकार बुलेटट्रेनवर हजारो कोटी रुपये खर्च करणार आहे, तोच पैसा देशभरातील रेल्वेसाठी खर्च केला तर जनतेला चांगली सुविधा मिळेल. मागच्या काळात उद्योगधंद्यात महाराष्ट्र एक नंबरवर होता. तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला. आमच्या काळातसर्व सामाजिक घटकांना मंत्री पद दिली गेली. मात्र आता मुंबईमध्येच मंत्री पदाची खैरात वाटली जात आहे. अ‍ॅट्रासिटीचा गैरवापर टाळावा, समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्याचे शासन करीत आहे. सध्या महिला, मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. सकल मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी, एस. सी., एस.टी.मध्ये अंसतोष भडकत असून, लाखो जनसमुदायांचे मूक मोर्चे निघत आहेत. याची शासनाला खंत वाटत नाही. शासन सर्व स्तरावर अपयशीठरले आहे, असे हे असंवेदनशील सरकार किती काळ ठेवायचे याचा विचार करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकासाठी कामाला लागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.यावेळी शेती तज्ज्ञ भगवानराव कापसे, सिताफळ तज्ज्ञ नारायण महानोर यांनी मार्गदर्शन केले. पारंपारिक शेतीऐवजी गट शेती, फळबाग लागवड करुन विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. राजेश टोपे यांनी मागेल त्याला शेततळे, पन्नीसहीत शंभर टक्के अनुदानावर शासनाने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा बँक सुरु झाल्याबद्दल समाधानव्यक्त केले. तसेच साखर कारखाना सुतगिरणीला लागलेली घरघर बंद झाली असून, लवकरच सुतगिरणी सुरु होणार असल्याची माहिती दिली.