शहरं
Join us  
Trending Stories
1
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
2
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
3
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
4
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
5
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
6
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
7
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
8
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
9
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
10
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
11
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
12
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
13
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
14
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
15
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
16
Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!
17
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
18
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
19
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
20
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

सध्याचे शासन शेतकरी विरोधी - अजित पवार यांचा आरोप

By admin | Updated: October 10, 2016 20:09 IST

डाळीचे भाव वाढत नाही, त्यातच शासनाने डाळ आयात करुन डाळीचे भाव पाडले. कांद्याला पाच रुपये किलोचा सुद्धा भाव मिळेना, टोमॅटो, मिरची मातीमोल भावाने विकण्याची

ऑनलाइन लोकमतसिंदखेडराजा, दि. 10 -  डाळीचे भाव वाढत नाही, त्यातच शासनाने डाळ आयात करुन डाळीचे भाव पाडले. कांद्याला पाच रुपये किलोचा सुद्धा भाव मिळेना, टोमॅटो, मिरची मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी कच शेती केली नाही, त्यांना शेतीची जाण नाही. तसेच हे शासन उद्योगधार्जिणे असून, शेतीविरोधी असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सिंदखेड राजा येथे केला.स्थानिक पंचायत समितीच्या प्रांगणावर १० आॅक्टोबर रोजी सहकार महर्षी कै.भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री राजेश टोपे यांचीउपस्थिती होती. फळबाग, नेटशेड, सेंद्रीय शेती, दुध, सिताफळ, आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करुन उत्पादन काढणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा स्मृतीचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान यावेळी सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, की सध्या दुधाला १८ रुपये भाव तर पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते. शेतकरी शेतमजुराला बँकेत खाते काढायला लावले. १५ लाख एका खात्यात जमा करण्याची घोषणा फोल ठरली. सरकार बुलेटट्रेनवर हजारो कोटी रुपये खर्च करणार आहे, तोच पैसा देशभरातील रेल्वेसाठी खर्च केला तर जनतेला चांगली सुविधा मिळेल. मागच्या काळात उद्योगधंद्यात महाराष्ट्र एक नंबरवर होता. तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला. आमच्या काळातसर्व सामाजिक घटकांना मंत्री पद दिली गेली. मात्र आता मुंबईमध्येच मंत्री पदाची खैरात वाटली जात आहे. अ‍ॅट्रासिटीचा गैरवापर टाळावा, समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्याचे शासन करीत आहे. सध्या महिला, मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. सकल मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी, एस. सी., एस.टी.मध्ये अंसतोष भडकत असून, लाखो जनसमुदायांचे मूक मोर्चे निघत आहेत. याची शासनाला खंत वाटत नाही. शासन सर्व स्तरावर अपयशीठरले आहे, असे हे असंवेदनशील सरकार किती काळ ठेवायचे याचा विचार करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकासाठी कामाला लागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.यावेळी शेती तज्ज्ञ भगवानराव कापसे, सिताफळ तज्ज्ञ नारायण महानोर यांनी मार्गदर्शन केले. पारंपारिक शेतीऐवजी गट शेती, फळबाग लागवड करुन विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. राजेश टोपे यांनी मागेल त्याला शेततळे, पन्नीसहीत शंभर टक्के अनुदानावर शासनाने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा बँक सुरु झाल्याबद्दल समाधानव्यक्त केले. तसेच साखर कारखाना सुतगिरणीला लागलेली घरघर बंद झाली असून, लवकरच सुतगिरणी सुरु होणार असल्याची माहिती दिली.