शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Maharashtra Election 2019 : प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात यावं, आठवलेंचं 'वंचित'ला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:15 IST

Maharashtra Election 2019 : वंचित बहुजन आघाडीचा म्हणजेच प्रकाश आंबेडकरांचा अप्रत्यक्षपणे भाजपाला फायदा होतो.

रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनीप्रकाश आंबेडकरांनाभाजपात येण्याचं आवाहन केलंय. प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केल्यास, सर्वच दलित संघटनांची एकत्र मूठ बांधण्यासाठी आपण भाजपला सोडणार का? असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, आठवलेंनी स्वत:ची तयारी दर्शवली आहे. दलित चळवळीच्या ऐक्याची माझी भूमिका कायम आहे, असे आठवलेंनी म्हटले. मात्र, प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात आलं पाहिजे, असेही आठवले म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडीचा म्हणजेच प्रकाश आंबेडकरांचा अप्रत्यक्षपणे भाजपाला फायदा होतो. माझा भाजपाला प्रत्यक्ष फायदा होतो. सध्या बहुजन समाजही हा भाजपासोबतच आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भजापात यावे, असे आवाहनच आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना केलं आहे. तसेच, वंचित भाजपाची बी टीम असेल, तर मी भाजपाची ए टीम आहे, असेही ते आपल्या विनोदी शैलीत म्हणाले. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून बहुजन समाज भाजपासोबत आलाय. आता, भाजापानेही आपली भूमिका बदलली असून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करता येणार नाही, हेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहित झालंय. त्यामुळेच, बाबासाहेबांचा संविधान नसतं, तर मी कधीच पंतप्रधान झालो नसतो, असे मोदी सांगतात. भाजपा पक्षच पूर्वीसारखा राहिला नसून बदलला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भाजपात यावे, असे आठवलेंनी म्हटले. एका खासगी न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीवेळी आठवलेंनी भाजपा-सेना, युतीतील जागावाटप, कॅबिनेट मंत्रीपद आणि आंबेडकर चळवळीबाबत चर्चा केली. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019