शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वंचितच्या मविआतील समावेशावर १५ दिवसांत निर्णय घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:52 IST

Prakash Ambedkar News: आमची तयारी पूर्ण झाली आहे. वंचितसोबत उद्धव ठाकरेंना लढायचे असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील समावेशाबाबत उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत उद्धव ठाकरेंनी पुढील १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. लवकर निर्णय झाला नाही,  तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिल्याचे सांगितले जात आहे. 

वंचितच्या मविआतील समावेशाबाबत उद्धव ठाकरेंनी १५ दिवसांत स्पष्ट करावे

वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत उद्धव ठाकरेंनी पुढील १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणे झाले, हे स्पष्ट करावे आता निवडणुका जवळ आल्या आहेत.  उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर भाष्य केले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांची स्तुती केल्याचे सांगितले जात आहे.  

दरम्यान, वंचित आणि उद्धव ठाकरेंना सोबत लढायचे असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल. यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. शरद पवारांवर होत असलेल्या 'पेरलं तेच उगवलं' या आरोपांमध्ये तथ्य नाही. राजकारणात परिस्थितीनुरूप राजकीय तोडफोडीचे निर्णय घ्यावे लागतात. पवारांनी आतापर्यंत राजकारणासाठी जे केले, ते आता त्यांच्यासंदर्भात घडले आहे. चौकशांच्या छायेखालील लोक अजित पवारांसोबत गेलेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी