शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:52 IST

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली असून, प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंच्या पाठिशी किती मराठा समाज उभा आहे, याची आकडेवारी दिली.

Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने एकामागून एक उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीची उमेदवारांची पाचवी यादी घोषित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यातच मनोज जरांगे यांच्या पाठिशी किती टक्के मराठा समाजातील मतदार आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. 

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनाचा या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकेल, याबाबत भाष्य केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे बांधव एकत्र आले होते. मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. सुरुवातीला निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर माघार घेतली. दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी आग्रही मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती. मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना किती टक्के मराठा समाजातील मतदारांचा पाठिंबा आहे, याबाबतचा एक आकडा सांगितला.

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज?

मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. ३० टक्के मतदार हा मनोज जरांगे पाटील म्हणतील, तसे मतदान करणार आहे, असा थेट आकडा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने २०२९ च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे, असे न सांगता, नरेंद्र मोदींची आहे, अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, मोहन भागवत यांचे नाव गेल्या सहा महिन्यात वर्तमानपत्रात ऐकले आहे का, अटलबिहारी वाजपेयी संघ कार्यालयात जात होते. मागच्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयात गेलेले नाहीत. मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे वेळ मागितली, त्यावेळेस ती वेळही दिली नाही. नरेंद्र मोदी यांनी संघ संपवला. भारतीय जनता पक्षही संपवला. आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे. मानेवर बसलेले मोदींचे भूत उतरवायचे का? त्यांच्या मानेवर बसलेले भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा संघाने त्यात आम्हाला मदत करावी, असे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४