शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:52 IST

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली असून, प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंच्या पाठिशी किती मराठा समाज उभा आहे, याची आकडेवारी दिली.

Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने एकामागून एक उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीची उमेदवारांची पाचवी यादी घोषित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यातच मनोज जरांगे यांच्या पाठिशी किती टक्के मराठा समाजातील मतदार आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. 

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनाचा या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकेल, याबाबत भाष्य केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे बांधव एकत्र आले होते. मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. सुरुवातीला निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर माघार घेतली. दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी आग्रही मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती. मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना किती टक्के मराठा समाजातील मतदारांचा पाठिंबा आहे, याबाबतचा एक आकडा सांगितला.

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज?

मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. ३० टक्के मतदार हा मनोज जरांगे पाटील म्हणतील, तसे मतदान करणार आहे, असा थेट आकडा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने २०२९ च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे, असे न सांगता, नरेंद्र मोदींची आहे, अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, मोहन भागवत यांचे नाव गेल्या सहा महिन्यात वर्तमानपत्रात ऐकले आहे का, अटलबिहारी वाजपेयी संघ कार्यालयात जात होते. मागच्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयात गेलेले नाहीत. मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे वेळ मागितली, त्यावेळेस ती वेळही दिली नाही. नरेंद्र मोदी यांनी संघ संपवला. भारतीय जनता पक्षही संपवला. आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे. मानेवर बसलेले मोदींचे भूत उतरवायचे का? त्यांच्या मानेवर बसलेले भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा संघाने त्यात आम्हाला मदत करावी, असे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४