शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:52 IST

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली असून, प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंच्या पाठिशी किती मराठा समाज उभा आहे, याची आकडेवारी दिली.

Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने एकामागून एक उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीची उमेदवारांची पाचवी यादी घोषित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यातच मनोज जरांगे यांच्या पाठिशी किती टक्के मराठा समाजातील मतदार आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. 

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनाचा या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकेल, याबाबत भाष्य केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे बांधव एकत्र आले होते. मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. सुरुवातीला निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर माघार घेतली. दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी आग्रही मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती. मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना किती टक्के मराठा समाजातील मतदारांचा पाठिंबा आहे, याबाबतचा एक आकडा सांगितला.

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज?

मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. ३० टक्के मतदार हा मनोज जरांगे पाटील म्हणतील, तसे मतदान करणार आहे, असा थेट आकडा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने २०२९ च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे, असे न सांगता, नरेंद्र मोदींची आहे, अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, मोहन भागवत यांचे नाव गेल्या सहा महिन्यात वर्तमानपत्रात ऐकले आहे का, अटलबिहारी वाजपेयी संघ कार्यालयात जात होते. मागच्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयात गेलेले नाहीत. मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे वेळ मागितली, त्यावेळेस ती वेळही दिली नाही. नरेंद्र मोदी यांनी संघ संपवला. भारतीय जनता पक्षही संपवला. आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे. मानेवर बसलेले मोदींचे भूत उतरवायचे का? त्यांच्या मानेवर बसलेले भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा संघाने त्यात आम्हाला मदत करावी, असे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४