शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

भाजपाला हुकूमशाही आणायचीय, 'त्या' वक्तव्याचं नवल नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 13:26 IST

आमचे मालक होण्यात तुमचे हित असेल पण तुमचे गुलाम होण्यात आमची इच्छा कशी असेल? या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा दाखला प्रकाश आंबेडकरांनी दिला. 

मुंबई - Prakash Ambedkar on AnantKumar Hegade ( Marathi News ) कर्नाटकच्या भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्या वक्तव्याचे मला नवल वाटलं नाही. सार्वजनिकरित्या असं वक्तव्य करण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. २०१७ मध्येही त्यांनी हेच म्हटल्याची आठवण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी करून दिली. तसेच १९५० मध्ये संविधान स्वीकारल्यानंतर आरएसएसने घेतलेली ही प्रतिज्ञा असल्याचा टोलाही प्रकाश आंबेडकरांनीभाजपाला लगावला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतीय संविधान हटवून त्याजागी मनुस्मृती आणण्याच्या आरएसएस आणि भाजपच्या दीर्घकालीन योजनेचा हा भाग आहे. त्यांना हुकूमशाही आणायची आहे आणि स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे. तसेच आपल्या राष्ट्राच्या धर्मनिरपेक्षतेची रचना बदलवायची आहे असा आरोप त्यांनी केला. 

त्याशिवाय आमचे मालक होण्यात तुमचे हित असेल पण तुमचे गुलाम होण्यात आमची इच्छा कशी असेल? या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा दाखला प्रकाश आंबेडकरांनी दिला. 

काय म्हणाले होते अनंत कुमार हेगडे?

हेगडे हे कर्नाटकातून सहा वेळा लोकसभा सदस्य राहिले आहेत. एका रॅलीत अनंत कुमार हेगडे म्हणाले की, काँग्रेसने संविधानात अनावश्यक गोष्टी जबरदस्तीने टाकल्या आहेत. विशेष म्हणजे असे कायदे ज्यातून हिंदू समाजाला दाबण्यासाठी केलेत. हे सर्व बदलायचे आहे. ते बहुमताशिवाय शक्य नाही. आता लोकसभेत काँग्रेस नाही आणि पंतप्रधान मोदींकडे दोन तृतीयांश बहुमत आहे तरीही हे शक्य नाही. कारण संविधानात बदलासाठी लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतासह दोन तृतीयांश राज्यातही विजय आवश्यक असतो असं त्यांनी सांगितले. तसेच मोदी यांनी अबकी बार ४०० पार घोषणा दिलीय, ती ४०० पार का? कारण लोकसभेत आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. परंतु राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही. राज्य सरकारमध्येही आमच्याकडे आवश्यक बहुमत नाही. जर आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागाहून अधिक जागा मिळाल्या तर राज्यसभेतही बहुमत मिळवण्यासाठी मदत होईल असं खासदार अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा